हैदराबाद – उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि इंडिया या दोन्ही आघाड्यांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. आता त्यांचे पक्ष तेलंगणात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र आले आहेत.
बीआरएसचे प्रमुख केसीआर आणि बसपचे प्रदेशाध्यक्ष आर.एस.प्रविणकुमार यांनी दोन्ही पक्षांमधील युतीची घोषणा केली. तेलंगणात लोकसभेच्या एकूण १७ जागा आहेत. बीआरएसने आतापर्यंत ५ उमेदवार जाहीर केले आहेत.
तो पक्ष बसपसाठी किती जागा सोडणार ते आगामी काळात स्पष्ट होईल. तेलंगणात लोकसभा निवडणुकीवेळी तिरंगी लढती रंगण्याची चिन्हे आहेत. त्या राज्यात कॉंग्रेस, भाजप आणि बीआरएस-बसप युतीमध्ये रस्सीखेच होईल.