मुंबई – बेबो करीना कपूरने 2000 साली अभिषेक बच्चनसोबत ‘रिफ्युजी’ चित्रपटातून बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. हा चित्रपट काही खास कमाई करू शकला नाही, पण करिनाला एकापाठोपाठ एक अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या. त्यावेळी करिनाने हृतिक रोशनसोबत अनेक चित्रपट केले. ‘कभी खुशी कभी गम’, ‘मुझसे दोस्ती करोगे’, ‘मैं प्रेम की दीवानी हूं’, ‘यादीं’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दोघे एकत्र दिसले होते. त्यांची केमिस्ट्रीही लोकांना खूप आवडली.
या चित्रपटांवेळी करीना आणि हृतिकमध्ये अफेअर सुरू असल्याच्या चर्चा होत्या. करीना हृतिकसाठी वेडी झाली होती आणि विवाहित असूनही हृतिकला करिनाबद्दल भावना होत्या. प्रकरण इतके पुढे गेले होते की हृतिकच्या कुटुंबाला दोघांमध्ये येऊन वेगळे व्हावे लागले.
त्यावेळी हृतिकने मुलाखतीत या गोष्टींचानकार दिला होता. तो म्हणाला,”या सर्व चर्चा खोट्या आहेत. मला स्वतःसाठी वाईट वाटत नाही पण करीनासाठी खूप वाईट वाटत कारण ती खूप गोड मुलगी आहे.’
तर करिनाने मुलाखत सांगितले,“मी कोणत्याही विवाहित पुरुषाचा वेडी नाही आणि माझे अफेअरही नाही. तुम्ही निर्माते, दिग्दर्शक आणि वितरकांना विचारता की त्यांना मला आणि हृतिकला का साइन करायचे आहे. कारण आम्ही हॉट जोडी आहोत.’