मुंबई- केंद्रसरकार कडूून अभिनेत्री कंगणा राणौतला वाय सिक्यूरीटी देण्यात आली आहे. कंगणा ही पहिली बाॅलीवूड अभिनेत्री आहे. कंगणा आणि शिवसेनेत सध्या बाचाबाची सुरु आहे. अनेकांनी यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
भारतात काही विशिष्ट व्यक्तींना या सुरक्षा प्रदान केल्या जातात. त्याच्या जीवाला धोका होवू नये म्हणून या सुरक्षा दिल्या जातात. त्यात उच्चतेनुसार उतरत्या क्रमवारीने पुढील प्रमाणे ‘सिक्युरिटी लेव्हल्स’ आहेत. – Z+, Z, Y आणि X.
कंगणा राणौतने मुंबईची तुलना पाक व्याप्त कश्मिरबरोबर केली. त्यावरुन वादाला तोंड फुटले. या वादात आता अनेक भर पडत चालली आहे. अनेक नेते, अभिनेते यांनी ट्विटरवर हल्ला चढवला आहे. या सगळ्यांमध्ये कंगणाच्या जिवाला धोका निर्माण होवू शकतो. म्हणून तिला वाय सुरक्षा देण्यात आली आहे. मात्र काय आहे वाय दर्जाची सुरक्षा?
काय आहे वाय दर्जाची सुरक्षा?
ही भारतातील तिसऱ्या क्रमांकाची सुरक्षा व्यवस्था आहे.वाय दर्जाच्या सिक्युरिटी मध्ये एकूण 11 कर्मचारी असतात ज्यात 1 किंवा 2 कमांडो आणि बाकी पोलीस ऑफिसर्स कर्तव्य बजावत असतात.यामध्ये 2 PSO (Personal Security Officer) सुद्धा असतात. भारतामध्ये बऱ्याच महत्वाच्या व्यक्तींना ही सुरक्षा प्रदान केली गेली आहे.