Uddhav Thackeray – शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना 22 जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्या राम मंदिर अभिषेक सोहळ्याचे निमंत्रण अद्याप मिळालेले नाही, त्यामुळे त्यांनी २२ जानेवारीला नाशिकच्या काळाराम मंदिरात महाआरती करून हा सोहळा साजरा करण्याचे योजले आहे. या संबंधात उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. अशात आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी अंबरनाथ येथे कार्यकर्त्यांशी बोलतांना पुन्हा एकदा मोदींवर याच मुद्यावरून काळाराम मंदिराच्या मुद्यावरून टीका केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले,’आपल्या देशाचा राम मंदिर सोहळा प्राण प्रतिष्ठा आहे. भाजपला आमची घराणेशाही नको पण गद्दारांची घराणेशाही मान्य आहे. शिंदेंच्या घराण्याला उमेदवारी दिली ही माझी चूक, निष्ठावंतांना डावलून त्यांना उमेदवारी दिली, काहींना कल्याण लोकसभा मतदारसंघ बापाची जहागिरी वाटते. निष्ठावंत शिवसैनिकांना डावलून घराणेशाहीला उमेदवारी दिली. ही चूक माझी आहे. पण, मी केलेली चूक शिवसैनिकांनी सुधरायची आहे. मीही सुधारणार आहे’ असेही ठाकरे म्हणाले
ते पुढे म्हणाले,’सभा घेण्यासाठी कल्याण मध्ये जेव्हा येईल तेव्हा शब्दांचा चाबूक घेऊन येणार आहे. संपूर्ण देशात कल्याण लोकसभेवरती एक वेगळी जबाबदारी आहे. आमच्यावर घराणेशाहीवरून टीका केली. मात्र टीका करणारे घरंदाज पाहिजेत. कल्याण लोकसभेत गद्दार यांच्या घराणेशाही थांबवायची जबाबदारी आहे. असं म्हणत त्यांनी श्रीकांत शिंदेंवर अप्रत्यक्षपणे टीका केली.