औंध : कार्यकर्त्यांसह कुटुंबियांशी संवाद साधत असताना मनसे प्रमुख राज ठाकरे.
औंध – मुंबई पोलीस, पुणे पोलीस तसेच महाराष्ट्र पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. पोलिसांना जर फक्त 24 तास मोकळीक दिली तर महाराष्ट्रातील सर्व गुन्हेगारांना पोलीस वटणीवर आणतील, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी रोखठोक सांगितले.
सोमेश्वरवाडी येथील मनसे कार्यकर्ते शिवम दळवी यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी राज ठाकरे बोलत होते. ते म्हणाले की, बाळासाहेबांचे नाव घेऊन सरकार चालवले जात आहे. पण, त्यांचे विचार पाळले जात नाहीत.
मराठी पाट्यांबाबत कोर्टाने आदेश काढूनही कार्यवाही होत नाही, पोलीस व कोर्टाचा धाक राहिलेला नाही, यामुळे राज्यात अराजकता माजेल. ड्रग्ज रॅकेट सर्वत्र चालू आहे यावर मात्र सर्व गप्प आहेत. सर्वांना यातून काही मिळते की काय, असे वाटू लागले आहे.
याप्रसंगी मनसेचे नेते बाबु वागसकर, वसंत मोरे, किशोर शिंदे, पुणे उपशहर अध्यक्ष सुहास निम्हण, मुळशी विद्यार्थी सेनेचे अनिल मातेरे, विभागाध्यक्ष सुधिर धावडे, उपविभागाध्यक्ष पांडुरंग सुतार, अनिकेत मुरकुटे, रमेश उभे, संजय काळे, शाखाध्यक्ष जितेंद्र कांबळे, अशोक मराठे, मयूर सूतार, किरण जाधव, किरण उभे, संदीप काळे, अमित राऊत, अभिजीत चौघुले, किरण रायकर, आणि परिसरातील मनसे सैनिक, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.