मुंबई- गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क मैदानात झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. सरकारने भोंगे उतरविले नाही तर अशा मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा वाजवा, असा आदेश राज यांनी मनसैनिकांना दिला.
तर, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने जातीपातीचे राजकारण केलं असं देखील राज ठाकरे यावेळी म्हणाले. “शरद पवारांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना केल्यापासूनच राज्यात जातीपातीचे राजकारण सुरू झाल्याची स्पष्टपणे टीका मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केली होती.
दरम्यान, राज यांच्या या भाषणानंतर राज्यातील अनके नेत्यांनी आपले मते मांडण्यास सुरुवात केली आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी देखील राज ठाकरेंवर निशाणा साधत आपली प्रतिक्रिया दिली आहे. “राज ठाकरे यांनी मुंब्र्याबद्दल कारण नसताना जातीयवादी विधान केले.
माझं राज यांना जाहीर आव्हान आहे की, त्यांनी माझ्यासोबत मुंब्र्यातील कोणत्याही मदरशात यावे. दाढीचा वस्तरा जरी सापडला तरी राजकारण सोडून देईल. मुंब्र्यात काही शतक हिंदू मुसलमान प्रेमानी राहतात मुंब्र्याला बदनाम करू नका.’ असं आव्हाड म्हणाले. या संदर्भातील एक व्हिडिओ सुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.