मुंबई : राज्यात रोज नवनव्या प्रकरणामुळे सत्तदाहरी आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक होताना पाहायला मिळत आहे. या नेत्यांमध्ये आता राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यात कलगीतुरा रंगला असल्याचे पाहायला मिळत आहे.जीएसटीवरून राज्य सरकार वारंवारपणे केंद्राकडे बोट दाखवत असल्याच्या प्रकरणावरून दोन्ही नेते एकमेकांसमोर उभे आहेत.
एका वृत्तवाहिनी सोबत बोलताना रावसाहेब दानवे यांनी “राज्य सरकार सतत म्हणते की राज्याचे पैसे केंद्र सरकारकडे आहे. जीएसटीचा पैसा केंद्राकडे आहे. मी म्हणतो, राज्यातील मंत्र्यांनी केंद्रासोबत बसावे आणि तुमचे किती पैसे केंद्राकडे आहे आणि केंद्राचे किती पैसे राज्याकडे आहे याचा हिशोब लावावा, असे म्हटले होते. याच मुद्दावरून जयंत पाटील यांनी राज्याचे बरेच पैसे केंद्राकडे आहेत. राज्याकडे केंद्राचे जे पैसे आहेत ते विकास प्रकल्पाचे आहेत. काही कारणामुळे प्रकल्प उशीर होत असल्यामुळे पैसे राज्याकडे आहेत,असे सांगतानाच हिशोबच जर मांडायचा असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मांडतील. रावसाहेब दानवेंकडे का मांडतील? असा सवालच जयंत पाटील यांनी केला आहे.
राष्ट्रवादीचा परिवर संवाद यात्रा आज सुरू होत आहे. जयंत पाटील आज कोकणात रायगड येथे जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत. येत्या 23 तारखेला कोल्हापूरला शरद पवारांच्या उपस्थितीत या यात्रेचा समारोप होणार आहे. त्यानिमित्ताने पाटील मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी भाजप आणि मनसेवरही टीका केली. भाजपा – मनसे एकच आहेत. भाजपला मनसेला जवळ करायचे आहे. पण उत्तर भारतीय मते हातातून जातील म्हणून भाजपचे नेते संभ्रमात असावे असं सांगितलं जात आहे. मात्र, राज ठाकरे यांची सभा झाल्यावरच त्यावर अधिक बोलू, असे जयंत पाटील म्हणाले.
शरद पवार यांच्या सिल्व्हर ओकवरील आंदोलनावरही त्यांनी भाष्य केले. तपास नेमका कुठपर्यंत आला माहीत नाही. आंदोलनाला खतपाणी घालणारे कोण आहेत? या आंदोलनामागे नेमकं कोण आहे? याबाबतचा पोलीस तपास करत आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे सुद्धा या तपासावर लक्ष ठेवून आहेत, असं त्यांनी सांगितलं. पवार यांच्या घरावर भ्याड हल्ला झाला. त्यांनी लोकांना बोलावले. डिवचले तरी काही उपयोग होणार नाही. आता एसटी कर्मचाऱ्यांना त्यांची चूक समजून आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, किरीट सोमय्या फरार झाले आहेत. त्याबाबत त्यांना विचारण्यात आलं असता संजय राऊत नेमकं काय म्हणाले मला माहीत नाही, असेदेखील त्यांनी सांगितले.