मुंबई – भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यंदाच्या आयपीएल स्पर्धेद्वारे पुनरागमन करणार आहे. तो पूर्ण तंदुरुस्त ठरला असून त्याबाबतचा आहवाल राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने (एनसीए) दिला असल्याचे सांगितले गेले मात्र, अद्याप एनसीएकडून याबाबत दुजोरा देण्यात आलेला नाही.
गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर राहिला आहे. त्याला मध्यंतरी काही मालिकांसाठी संघात निवडले गेले होते. मात्र, त्याची दुखापत पुन्हा वाढू नये यासाठी त्याला खेळवण्यात आले नाही. मात्र, आता तो मॅचफिट ठरला असून यंदाच्या आयपीएल स्पर्धेत तो निश्चितच खेळणार आहे, असे बीसीसीआयकडून सांगितले जात आहे.
बीसीसीआयने घातल्या काही अटी…
वर्कलोड मॅनेजमेंटबाबत बीसीसीआयने बुमराहसाठी काही अटी घातल्या आहेत. त्याच्यावर जास्त ताण येणार नाही तसेच त्याला पूर्ण तंदुरुस्त वाटत असेल तरच त्याला खेळवावे, असेही संकेत बीसीसीआयने बुमराहच्या मुंबई इंडियन्सला दिले आहेत.
ICC World Test Championship : आता ऑस्ट्रेलियासाठी जर-तरचे समीकरण
मात्र, मुंबई इंडियन्स या अटी मान्य करणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बुमराहला संघात खरेदी करण्यासाठी मुंबई इंडियन्स वर्षाला 12 कोटी रुपये मोजत आहे त्यामुळे त्याचा सामने खेळण्याचा दिवस कधी येणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.