पुणे – विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेल्या व्यक्ती समाजात विधायक बदल घडवितात आणि असे व्यक्ती इतिहास घडवितात. असाच एका ध्येयाने प्रेरित झालेले उत्तम धोका यांनी सायकलवरून ही भारतातील तिर्थक्षेत्रचा प्रवास होवू शकतो, असा संदेश देण्याच्या उद्देशाने आकाश राठोड यांच्यासह या वर्षी पुन्हा एकदा पुणे ते गिरनारजी -सोमनाथ ११०० कि.मी. चा टप्पा सायकल व्दारे अवघ्या ९ दिवसांत पूर्ण केला आहे.
पुणे सातारा रस्त्यावरील आदिनाथ सोसायटी येथून सुरु केलेली मोहिम ९ दिवसांत गुजरात मधील राजकोट येथील जैन धर्मियांचे श्रध्दास्थान गिरणारजी तिर्थक्षेत्र येथे १८ जानेवारी २०२४ ला पोचली. तसेच सोमनाथजी आणि गिरनारजी येथील दत्त मंदीराचाही प्रवास या दोघांनी सायकल द्वारे पुर्ण केला. या सायकल मोहिमेत धोका यांच्या नेतृत्वाखाली आकाश राठोड, सुरेश पिताणी, विर उत्तम धोका हे वॉरिअर्स सहभागी झाले होते. दररोज १२० ते १३० किलामीटर अंतर वातावरणांच्या बदलाची परवा न करता पार करत गिरनारजी तिर्थक्षेत्र गाठले. सायकल वरूनही भारतातील सर्व तिर्थक्षेत्राचा प्रवास करता येईल हा संदेश देण्याच्या उद्देशाने तिर्थक्षेत्र प्रवासाचा मानस घेतलेल्या धोका यांनी आता पर्यंत सुमारे सात राज्यातील विविध तिर्थक्षेत्राचा प्रवास करून ५४०० कि.मी. अंतर कापलेले आहे.
आरोग्या सोबत सायकलवरून तिर्थक्षेत्राचे दर्शन घेणे असा अगळावेगळा उपक्रम २०१९ मध्ये सुरु केला गेला. प्रथम धोका यांनी पुणे शहरातील विविध तिर्थक्षेत्र म्हणजेच दगडूशेठ मंदीर, चतुश्रृंगी, पाषाण येथील शंकर मंदीर, जेजुरी आदी ठिकाणापासून सायकलिंगची सुरुवात केली. २०१९ साली पुणे ते पालिताना ८०० कि. मी.चा लांबचा पल्ला सायकलवरून त्यांनी पुर्ण केला. त्यानंतर त्यांनी पुणे ते शिर्डी, पुणे ते तूळजापूर, पुणे ते पंढरपूर, पुणे ते गेटवे ऑफ इंडिया, पुणे ते अंतरिक्ष पार्श्वनाथ जैन तिर्थ असा ५०० किलोमीटरचा प्रवास एकट्याने ३ दिवसांत पुर्ण केला. पुढे त्यांचा सायकल चालविण्याचा विश्वास इतका वाढला की २०२३ मध्ये तब्बल २१०० किलोमीटरचा प्रवास करीत पुणे ते सम्मेत शीखरजीचा हा प्रवास त्यांनी १७ दिवसांत पुर्ण केला.
IND vs ENG Test Series : इंग्लंड देऊ शकतो भारताला व्हाईट वाॅश – माॅंटी पानेसर
अशा प्रकारे आता पर्यंत ५४०० किलोमीटरचा प्रवास त्यांनी केला आहे. भविष्यात भारतातील सर्वच तिर्थक्षेत्राचे दर्शन साकलवरून करणार असल्याचा दृढ निश्चय उत्तम धोका व त्यांच्या टीम ने केला आहे. यासह पुणे ते केदारनाथ सोबत राजस्थानमधील सर्व जैन तिर्थक्षेत्राचे दर्शन सायकल व्दारे करणार असल्याचेही धोका यांनी यावेळी सांगितले.
आरोग्य व धर्माचे व्यसन पाळा…
उत्तम धोका यांचे वय ४७ असून हे जैन समाजाशी निगडीत असल्याने प्रथम त्यांनी जैन समाजाचे तिर्थक्षेत्र सायकलवरून प्रवास करित दर्शन घेतले. तसेच त्यांचा ज्युली बॅग्ज (बॅग्ज उत्पादन) म्हणून व्यवसाय पुणे शहरात आहे. युवकांना धर्माशी व्यवसाय करित आरोग्य सांभाळून धर्म कसा जपावा हा संदेश ते देत आहेत. व्यसनाधिन होण्यापेक्षा आरोग्य व धर्माचे व्यसन जपावे हा आदर्श युवकांसमोर ठेवत आहेत.