मुंबई – देशभरात आज राष्ट्रीय किसान दिवस साजरा होत आहे. अशातच केंद्र सरकारच्या कृषी धोरणाला विरोध करण्याकरिता गेल्या तीन आठवड्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करीत आहेत. यावरून राष्ट्रवादी कॉग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
शरद पवार म्हणाले कि, अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असलेल्या बळीराजाला उचित सन्मान देण्याची प्राथमिक जबाबदारी शासनकर्त्यांची आहे. पण आज दुर्दैवाने देशाच्या शेतकऱ्याला त्याचे हक्क व मागण्यांसाठी आंदोलन करावे लागतेय. देशाच्या बळीराजाला न्याय मिळावा हीच राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त सदिच्छा व्यक्त करतो, असे त्यांनी म्हंटले आहे.
अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असलेल्या बळीराजाला उचित सन्मान देण्याची प्राथमिक जबाबदारी शासनकर्त्यांची आहे. पण आज दुर्दैवाने देशाच्या शेतकऱ्याला त्याचे हक्क व मागण्यांसाठी आंदोलन करावे लागतेय. देशाच्या बळीराजाला न्याय मिळावा हीच राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त सदिच्छा व्यक्त करतो. pic.twitter.com/3CWWLuHrdV
— Sharad Pawar (@PawarSpeaks) December 23, 2020
दरम्यान, केंद्रीय कृषी कायद्यांविषयी चर्चेच्या पुढील फेरीसाठी तारीख निश्चित करावी, असा प्रस्ताव मोदी सरकारकडून शेतकरी संघटनांना देण्यात आला आहे. त्यावर शेतकरी संघटनांकडून मंगळवारी निर्णय अपेक्षित होता. मात्र, तो निर्णय एक दिवस लांबणीवर टाकण्यात आला. आता आज देशभरातील शेतकरी नेत्यांची बैठक होणार आहे. त्या बैठकीत सरकारबरोबरच्या चर्चेविषयीचा निर्णय होईल. अर्थात, कृषी कायदे मागे घेण्याच्या प्रमुख मागणीवर ठाम असल्याचे शेतकरी संघटनांनी पुन्हा स्पष्ट केले आहे.