नवी दिल्ली: उष्णतेमुळे त्रस्त असलेल्या लोकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. मान्सून सतत पुढे सरकत असून भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या म्हणण्यानुसार, येत्या 48 तासांत देशातील बर्याच राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमधील काही भागात येत्या 48 तासांत पाऊस पडेल, असे विभागाने म्हटले आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार येत्या दोन दिवसांत मान्सूनने बिहारमध्ये दडी मारण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र आणि पश्चिमेकडील हालचालींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. दक्षिण गुजरात, दक्षिण मध्य प्रदेश, झारखंड आणि बिहारच्या दिशेने मान्सून समोर येत आहे. त्यामुळे येत्या 48 तासांत या राज्यांच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
I think it’s still a long time to wait (for monsoon to reach Delhi). First we have to see how it moves into Madhya Pradesh, then to UP and then Delhi. So Delhi is still a long time away: Anand Sharma, Deputy Director-General, India Meteorological Department (IMD) https://t.co/ZFXEJo48Jj
— ANI (@ANI) June 12, 2020
तथापि, हवामान खात्याने सांगितले की, मान्सूनला दिल्ली गाठायला अजून वेळ आहे. सर्वप्रथम हे पाहावे लागेल की मान्सून मध्य प्रदेश आणि त्यानंतर यूपीपर्यंत कधी पोहचेल. तरच तो दिल्लीत पोहोचेल त्यासाठी बराच वेळ आहे.
हवामान खात्याने सांगितले की, येत्या दोन दिवसात कर्नाटकच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासांत तेलंगणा, आसाम आणि मेघालयात वेगवेगळ्या वेळी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच कोकण आणि गोव्यातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.