मुंबई – भारतात जर क्रीडा संस्कृती रूजावी असे वाटत असेल तर शालेय शिक्षणात क्रीडा विषय असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मत केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजीजू यांनी व्यक्त केले आहे.
नव्या शतकाकडे वाटचाल करत असताना ऑलिम्पिक एज्युकेशन हा विषय शालेय जीवनापासून मुलांना शिकवला गेला पाहिजे. जितके महत्त्व शालेय शिक्षणाला आहे तेच क्रीडा शिक्षणाला दिले गेले तरच देशात क्रीडा संस्कृती रूजेल. राष्ट्रीय क्रीडा शिक्षण मंडळाची स्थापना करणे आवश्यक आहे तसेच ऑलिम्पिक संग्रहालय देखील स्थापन केले पाहिजे, असेही रिजीजू म्हणाले.