Israel Gaza Attack: इस्रायल-हमास युद्धात अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याच्या मुद्द्यावर पंतप्रधान कार्यालयापासून ते परराष्ट्र मंत्रालयापर्यंत बारीक लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सोमवारी (9 ऑक्टोबर) परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना पत्र लिहून केरळमधील रहिवाशांसह भारतीयांच्या सुरक्षेसाठी हस्तक्षेप करण्याची मागणी केली.
हमास आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष चौथ्या दिवशीही सुरूच आहे. या संघर्षात आतापर्यंत 1600 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हमासच्या हल्ल्यात 9 अमेरिकन, 3 ब्रिटन, 1 जर्मन आणि 10 नेपाळी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हमासच्या हल्ल्यांविरोधात जगातील अनेक देश इस्रायलच्या समर्थनार्थ उभे आहेत. त्याचबरोबर इराणसह सर्व मुस्लिम देशांनी हमासला पाठिंबा दिला आहे.
केरळमधील 7000 नागरिक इस्रायलमध्ये अडकले –
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी परराष्ट्र मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांपैकी 7,000 लोक हे केरळ राज्यातील आहेत. शत्रुत्वामुळे या नागरिकांना मोठ्या अडचणीत टाकले जात आहे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य चिंताग्रस्त आहेत. चिंता व्यक्त करून ते म्हणाले, “मी तुम्हाला विनंती करतो की इस्रायलमधील आमच्या नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी शक्य ते सर्व पावले उचलावीत, हस्तक्षेप करा. ”
इस्रायल-हमास युद्ध –
9 ऑक्टोबर 2023 रोजी हमासच्या सैनिकांनी इस्रायलवर सुमारे 5000 रॉकेट डागले. एवढेच नाही तर हमासच्या अनेक लढवय्यांनी इस्रायलच्या हद्दीत घुसून नागरिकांना लक्ष्य केले. हमास संघटना गाझा पट्टीवर राज्य करते आणि पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहे.
इस्त्रायल-हमास युद्धात दोन्ही बाजूंनी आतापर्यंत 1600 हून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. संयुक्त राष्ट्रांसह अनेक देश इस्रायल-हमास युद्ध थांबवण्याचे आवाहन करत आहेत, जेणेकरून नागरिक आणि ओलीस ठेवलेल्या नागरिकांना वाचवता येईल. इस्रायली लष्कराने दावा केला आहे की, त्यांनी आपल्या हद्दीत सुमारे 1500 हमास लढवय्ये मारले असून सीमेवर पुन्हा नियंत्रण मिळवले आहे.