ISIS Terrorist : देशात अशा काही घटना आहेत ज्यांच्या आठवणी आजही मनाला वेदना पोहचवतात. त्यातीलच एक घटना म्हणजे गोधरा हत्याकांड आणि त्यानंतर उसळलेली दंगल. याच दंगलीविषयी आयसीसचा दहशतवादी शाहनवाज याने खळबळजनक खुलासा केला आहे. गोधरानंतरच्या दंगलीचा बदला घेण्यासाठी गुजरात दहशतवाद्यांच्या रडारवर होते असे शाहनवाज याने म्हटले आहे. शाहनवाज याने चौकशीदरम्यान माहिती देताना “गुजरातमध्ये सीरियल बॉम्बस्फोटाची योजना आखली होती, असे सांगितले आहे, तसेच गुजरातमधील अनेक शहरांमध्ये बॉम्बस्फोट मालिकेची तयारी असल्याचे त्याने यावेळी सांगितले आहे.
आयसीसचा दहशतवादी शाहनवाज सध्या दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला गेल्यावर्षी 2 ऑक्टोबर रोजीपोलिसांनी अटक केली होती. त्यासोबतच शहनवाज याच्यावर पाच लाख रुपयांचे बक्षीस होते. मागील तीन महिन्यापांसून त्याची कसून चौकशी होत आहे. चौकशीवेळी शाहनवाज याने अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत.
शाहनवाज याने दिल्ली पोलिसांना माहिती देताना, ” हँडलर अबू सुलेमान याच्या सांगण्यावरुन दोन दहशतवाद्याने अहमदाबाद, वडोदरा आणि सूरत या शहराच्या कानाकोपऱ्याची माहिती काढण्यास सुरुवात केली होती. गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृह राज्य असल्याचे आयसीसला माहित आहे. त्यामुळे गुजरात राज्यात मोठा हल्ला करण्याची तयारी होती.” चौकशीत शाहनवाज याने पुढे सांगितले की, ‘गोधरा दंगलीचा बदला घेण्यासाठी गुजरातमध्ये दहशतवादी हल्ला केला जाणार होता.’ असेही त्याने चौकशीत म्हटले आहे.
दरम्यान, चौकशीवेळी शहनवाज याने,”आयसीसचे दहशतवादी ट्रेनने अहमदाबाद येथे पोचले. तिथे त्यांनी दोन दिवस रेकी केली. पहिल्या दिवशी रेल्वे स्टेशन, सिनेमा हॉल, विद्यापीठ, व्हीआयपी रस्ते, नेत्यांचे मार्ग (पण त्यांना निर्णायक मार्ग मिळाला नाही) , अटल प्रवासी पूल याच्यासोबत गर्दीच्या ठिकाणांचं निरीक्षण केले. मस्जिद, दरगाह, मजार, साबरमती आश्रम यासारख्या गर्दीची ठिकाणं दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होती,” असे त्यांनी म्हटले.
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ते दहशतवादी गांधीनगर येथे गेले होते. तिथे त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालय, विश्व हिंदू परिषद (विहिप) कार्यालय, हायकोर्ट, जिल्हा कोर्ट, सत्र न्यायालय, भाजप कार्यालयाचा दौरा केला. दहशतवाद्यांनी या सर्व ठिकाणीचे फोटो आणि व्हिडीओ काढण्यात आले. या सर्वांसाठी त्यांनी तेथे रेंटवर दुचाकी घेतली होती, त्यावरुन ते संपूर्ण शहरात फिरले, अन् आपले टार्गेट्सची निवड केली.अशा पद्धतीने दहशतवाद्यांनी गुजरातला रडारवर ठेवून याठिकाणी मोठा घातपात करण्याचा डाव आखला होता असे त्याने सांगितले आहे.