मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेत कलगीतुरा रंगला आहे. यामुळे राज्यातील सरकार स्थापनेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशातच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आठवडाभरात सरकार स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असे वक्तव्य केले होते. तर भाजपाने राष्ट्रपती राजवटीचा इशारा देणं हा लोकशाहीचा अपमान आहे, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हंटले होते. यावर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले कि, आम्हाला वेळेत सरकारची स्थापना न केल्यास काय होईल असा प्रश्न विचारण्यात आला होता. आम्ही सहज उत्तर दिले की घटनेतील तरतुदीनुसार विहित कालावधीत सत्ता स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाईल. समजा, जर शिक्षक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत असतील तर तो इशारा म्हणून घेण्यात येतो काय?, असा प्रश्नही त्यांनी विचारला.
Sudhir Mungantiwar, BJP: We were asked what would happen if govt is not formed in time. We simply answered that according to provisions of constitution, President’s rule will be imposed. Suppose, if a teacher answers queries of students, is it taken as warning? #Maharashtra pic.twitter.com/bppRpx2v8z
— ANI (@ANI) November 2, 2019
दरम्यान, सरकार स्थापनेसाठी विलंब होणं ही काही मोठी बाब नाही. मात्र अशात सत्ताधारी पक्षाचे मंत्री राष्ट्रपती राजवटीचा इशारा देत आहेत याला काय अर्थ आहे? भाजपच्या मंत्र्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी दिली आहे. ही धमकी म्हणजे जनादेशाचा अपमान आहे. राष्ट्रपती कोणाच्या खिश्यात नाही. राष्ट्रपतींना या गोंधळात ओढू नये, अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली होती.