सातारा – व्यापारी पेठेत आढळणारी पार्किंगची बेशिस्त आणि दुकानांसमोर टाकण्यात येणाऱ्या लोखंडी जाळ्या पार्किंगच्या समस्येत भर घालत राहतात. ग्राहकाला दुकानात प्रवेश करायचा म्हणजे कुठेतरी दूर वाहन लावणे आणि वाहनाची काळजी करीत खरेदी करणे असा सोपस्कार पार पाडावा लागतो. ग्राहकांचीही गैरसोय आणि व्यापाऱ्यांचीही अडचण अशा अवस्थेतून दिवसेंदिवस पार्किंगची समस्या बिकट बनत चालली आहे. संबंधित यंत्रणांनी याबाबत नेटके नियोजन केल्यास दिलासा मिळणार आहे.
आधीच वाहतूक सुविधांचा अभाव त्यात व्यापाऱ्यांच्या दुकानासमोरील लोखंडी जाळ्यांनी बाजारपेठेतील पार्किंगचा श्वास गुदमरला आहे. या पेठेत व्यावसायिक इमारतींच्या बेसमेंट पार्किंगचा अभाव असल्यामुळे दुचाकी वाहने रस्त्यावर आणि दुचाकींच्या गर्दीत दुकानात ग्राहकांना येता यावे म्हणून रस्त्यावरच लोखंडी जाळ्यांची तजवीज, असे चित्र नेहमीच दिसते. यामध्ये शहर विकासाच्या नियोजनाला काही धरबंदच उरला नाही. मोती चौक ते शनिवार चौक (501 पाटी) या अर्धा किलोमीटरच्या रस्त्यासह खण आळी व झारीचा बोळ येथे वाहनांच्या पार्किंगला सध्या तरी सम विषम तारखांचा पर्याय आहे. व्यापारी पेठेत पे अँड पार्कलासुद्धा स्वतंत्र जागा नाही. सध्या रस्त्याच्या एका बाजूला दाटीवाटीने होणाऱ्या
साताऱ्यात पार्किंग समस्या आणि अतिक्रमण समस्या गंभीर असताना शासकीय यंत्रणा त्यांना रोखण्याचे काम गांभीर्याने करत नाही. परिणामी वाहतूक व्यवस्थेत बेशिस्तपणा बोकाळतो. पंचमुखी मंदिर परिसरातील रस्त्यावरील हातगाडे हे वाहतूक कोंडीचे मूळ कारण आहे. पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाच्या कारवाया होतात. मात्र, त्यांची पाठ फिरल्यावर अतिक्रमणे जैसे थे असतात. धडक कारवाईचा खमकेपणा मुख्याधिकाऱ्यांनी दाखवायला हवा. पे अँड पार्किंगची प्रशस्त सोय होणे अपेक्षित आहे.
श्रेणिक म्हसवडकर, व्यापारी