#IREvIND 2nd T20 Match : ऋतुराज गायकवाडचे दमदार अर्धशतक तर रिंकू सिंह आणि शिवम दुबे यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत पाच विकेटच्या मोबदल्यात 185 धावांपर्यंत मजल मारली असून आयर्लंडपुढे विजयासाठी 186 धावांचे आव्हान ठेवलं आहे.
भारताकडून ऋतुराज गायकवाडने 43 चेंडूत सर्वाधिक 58 धावा केल्या तर संजू सॅमसन याने 26 चेंडूत 40 धावांचे योगदान दिले. रिंकू सिंह याने 21 चेंडूत 38 धावांची झंझावती खेळी केली. या खेळीत त्याने तीन षटकार आणि दोन चौकार लगावले.
तर शिवम दुबे याने 16 चेंडूत दोन षटकाराच्या मदतीने नाबाद 22 धावा जोडल्या. शेवटच्या दोन षटकांत रिंकू सिंह आणि शिवम दुबे यांनी 42 धावा जोडून भारताची धावसंख्या 185 धावांवर नेली.
आयर्लंडकडून बॅरी मॅकार्थीने दोन बळी घेतले तर मार्क एडेअर, बेंजामिन व्हाईट आणि क्रेग यंग यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.