#IREvIND 3rd T20 : भारत आणि आयर्लंड यांच्यातील तीन टी-२० मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना डब्लिन येथे खेळवला जाणार आहे. मालिकेत क्लीन स्वीपकडे भारताचे लक्ष लागले आहे.
पहिल्या आणि दुसऱ्या टी-20मध्ये त्याने यजमानांचा पराभव केला. भारताने याआधी 2018 आणि 2022 मध्येही आयर्लंडला मालिकेत हरवले होते.
दरम्यान, भारत आणि आयर्लंड यांच्यातील तिसर्या T20 मध्ये अद्याप टॉस (Toss) झालेला नाही. डब्लिनमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. दोन्ही संघ अजूनही ड्रेसिंग रूममध्ये आहेत. काही वेळापूर्वी हवामान स्वच्छ होते, मात्र अचानक आलेल्या पावसामुळे टॉसला(Toss) उशीर झाला आहे.