मुंबई – आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात नव्याने दाखल झालेल्या संघांची कामगिरी स्पर्धेत आधीपासून असलेल्या संघांपेक्षा सरस होत आहे. त्यातही स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज व कोलकाता नाईट रायडर्स हे संघ तळातील तीन क्रमांकावर आहेत. मात्र, स्पर्धा निर्णायक टप्प्यावर आलेली असताना हेच तीन संघ विजय मिळवत असून त्यांनी त्यांचे उर्वरीत सर्व सामने जिंकले तरीही ते प्लेऑफमध्ये पात्र ठरू शकणार नसले तरी सध्या जे संघ पहिल्या पाच क्रमांकात आहेत, त्यांना धक्का देऊ शकतात.
गुजरात जायंट्स, लखनौ सुपर किंग्ज, राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद व रॉयल चॅलेंजर बेंगळुरु हे संघ पहिल्या पाच स्थानांवर आहेत. कोलकाता, पंजाब, चेन्नई व मुंबई हे अखेरच्या पाच क्रमांकावर आहेत. यातील कोलकाताचे 10 तर बाकी संघांचे 9 सामने झाले असून कोलकाताला चार तर बाकी संघांना पाच सामने खेळायचे आहेत. हे सामने या संघांनी जिंकले तर प्लेऑफमध्ये मुळातच दाखल झालेल्या गुजरात संघाचा अपवाद वगळता अन्य चारही संघांना फटका बसू शकतो.
प्लेऑफमध्ये दाखल होण्यासाठी किमान 16 गुणांची गरज आहे. दिल्ली, कोलकाता व पंजाबचे प्रत्येकी 8 गुण आहेत. तर चेन्नईचे 6 व मुंबईचे 2 गुण आहेत. या संघांनी जर स्पर्धेत पुढील सामने जिंकले तर त्यामुळे सध्या ज्या संघांचे 8 गुण आहेत, त्यांचे गुण वाढतील व त्यामुळे राजस्थान, हैदराबाद व बेंगळुरुला धोका निर्माण होऊ शकतो. तळातील संघांनी स्पर्धेच्या सुरुवातीला सातत्याने सामने गमावले. मुंबईने तर सलग आठ पराभव पत्करले मात्र, आता त्यांनी एक सामना जिंकत 2 गुणांची कमाई केली आहे. मात्र, उरलेले पाचही सामने जिंकले तरी ते प्लेऑफ गाठू शकत नाहीत मात्र, ज्यांना प्लेऑफ गाठण्याची संधी आहे, त्यांना ते धक्का लावू शकतात.
जे चित्र मुंबईचे आहे तेच चेन्नईबाबतही आहे. त्यांचे सहा गुण आहेत व त्यांनाही आणखी पाच सामने खेळायचे असून ते सामने जिंकले तर त्यांचेही 16 गुण होतील सरस नेटरनरेटच्या गणितावर संघांना प्लेऑफचीही संधी मिळेल. त्यामुळे आता या स्पर्धेतील रंगत जास्त वाढली आहे.