मुंबई – महाराष्ट्राचा स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाड याला मायदेशात वेस्ट इंडिज विरुद्ध होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. मात्र, यावेळी तरी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व नियमित कर्णधार रोहित शर्मा त्याला अंतिम संघात खेळवतील का, असा सवाल नेटिझन्सनी केला आहे. ऋतुराजने विजय हजारे स्पर्धा तसेच यंदाच्या आयपीएल स्पर्धेत सातत्याने धावा केल्या आहेत.
संघ निवडीत फिंगर स्पिनरचे वर्चस्व
एकदिवसीय तसेच टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी निवडण्यात आलेला भारतीय संघ पाहिला तर संघात फिंगर स्पिन गोलंदाजांना जास्त संधी दिली गेल्याचे समोर येत आहे. रवी बिष्णोई, कुलदीप यादव व वॉशिंग्टन सुंदर या तीनही फिंगर स्पिन गोलंदाजांचा या मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.