इंदुर – भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना येत्या 1 मार्चपासून येथे सुरु होत आहे. मात्र, या सामन्यासाठी अंतिम 11 खेळाडू निवडण्यासाठी कर्णधार रोहित शर्माची डोकेदुखी वाढणार आहे. त्यातच लोकेश राहुलच्या सुमार कामगिरीमुळे त्याच्यावर दबावही वाढला असून या सामन्यासाठी त्याच्या जागी शुभमन गिलला तर यष्टीरक्षक फलंदाज श्रीकर भारताने चांगली कामगिरी करुनही त्याच्या जागी इशान किशनला संधी दिली जाऊ शकते.
या सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवण्यासाठी फलंदाजी भक्कम करण्याचा हेतू ठेवला जाणार असल्याचे उघड आहे. पहिल्या दोन्ही कसोटीत रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन व अक्सर पटेल यांनी गोलंदाजीसह फलंदाजीतही चमक दाखवल्यामुळे भारताला समाधानकारक धावसंख्या उभारता आली होती.
Sania Mirza : भारताची टेनिसस्टार सानियाच्या कारकिर्दीची पराभवाने अखेर
तसेच याच गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाची भक्कम फलंदाजी उध्वस्त करत हे दोन्ही सामने जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. मात्र, आता संघात हे दोन बदल करुन फलंदाजीत बळकटी आणण्यासाठी रोहित शर्मा आग्रही राहणार आहे.
असा असेल भारताचा अंतिम संघ – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, इशान किशन (यष्टीरक्षक), अक्सर पटेल, रविचंद्रन अश्विन, महंमद शमी, महंमद सिराज.