कोल्हापूर : 1943 सालापासून कोल्हापूर आणि पोलंड चे संबंध हे मैत्रीपूर्ण आहेत. याचे अनेक दाखले हे कोल्हापुरात पाहायला मिळतात. याच मैत्रीपूर्ण संबंधाचा फायदा रशिया आणि युक्रेन यांच्या महायुद्धात युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी एका कोल्हापूरकराने थेट पोलंडच्या अध्यक्षांना पत्र पाठवले आहे.पोलंडने भारतीय विद्यार्थ्यांना आश्रय द्यावा अशी मागणी या पत्रातून केली गेली आहे.
युक्रेन आणि रशियात सध्या चालू असलेल्या युद्धात हजारो सैनिक आणि नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. गेल्या आठवड्याभरात जगभरात फक्त महायुद्धाची चर्चा सुरू आहे. त्यातच भारतातील एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. सध्या युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना पोलंडकडून मदत व्हावी, यासाठी कोल्हापूरकर नागरीक असलेले उत्तम पाटील यांनी पोलंडचे अध्यक्ष आंद्रे दुडो यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे.
युक्रेन आणि रशिया यांच्या जवळच्या देशांच्या सीमेजवळ पोलंड अग्रक्रमाने येतो.1942 साली झालेल्या दुसऱ्या महायुद्धात पोलंडची अवस्था प्रचंड बिकट झाली होती. यावेळी हजारो पोलंड वासीयांनी देश सोडून जिथे मिळेल तिथे आश्रय घेतला. त्यापैकीच 5 हजार पोलंडवासियांना कोल्हापूरकरांनी म्हणजेच त्याकाळचा करवीर संस्थांनी आश्रय दिला होता.
वळीवडे या गावात वळीवडे या गावात त्यांच्यासाठी एक छावणी देखील उभी करण्यात आली होती आणि तेव्हापासून कोल्हापूर आणि पोलंडचे संबंध हे मैत्रीपूर्ण बनले. विशेष म्हणजे आजही त्यांची तिसरी पिढी कोल्हापुरात कार्यरत आहे. शिवाय 78 पोलंड नागरिकांच्या दफनभूमी ही कोल्हापुरात आहे. त्यामुळे पोलांड देशाने भारतीय विद्यार्थ्यांना मदत करावी अशी मागणी पुढे आली. अशी मागणी कोल्हापूरचे इतिहास अभ्यासक रविराज निंबाळकर यांनी केली आहे.