नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक डिजिटल परिवर्तनाच्या बाबतीत आघाडीवर राहिला असून, भारताने विकास तसेच माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञानाच्या वापराच्या बाबतीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे, केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांनी डब्ल्यूएसआयएस 2022 अर्थात या वर्षीच्या जागतिक माहिती संघटनेच्या शिखर परिषदेत सांगितले.
स्वित्झर्लंडमध्ये जिनिव्हा येथे 31 मे ते 3 जून 2022 या कालावधीत पार पडलेल्या या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी गेलेल्या भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व देवुसिंह चौहान यांनी केले. आयटीयू अर्थात आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ, संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, युनेस्को अर्थात वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना, यूएनडीपी अर्थात संयुक्त राष्ट्रांचा विकासविषयक कार्यक्रम तसेच यूएनसीटीएडी अर्थात संयुक्त राष्ट्रांची व्यापार आणि विकास परिषद यांच्या सर्व डब्ल्यूइआयएस कृती वाहिनीचे सह-सुविधाकार तसेच संयुक्त राष्ट्रांच्या इतर संघटनांसोबत दृढ सहकारी संबंध प्रस्थापित करून संयुक्त विद्यमाने या डब्ल्यूएसआयएस शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
भारत आयटीयू मंडळाच्या 2023 ते 2026 या कालावधीसाठी पुन्हा निवडणूक लढवत आहे. भारत 1869 पासून या मंडळाचा सदस्य आहे आणि तेव्हापासून मंडळाचे कार्य, संघाचे उपक्रम यामध्ये अखंडितपणे भाग घेत असून जागतिक समुदायाच्या हितासाठी दूरसंचार तसेच माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान विभागाच्या वाढीसाठी तसेच विकासासाठी शक्य तितक्या अधिक प्रमाणात योगदान देत आहे.