रूग्ण बरे होण्याचा दर 71.91 टक्क्यांवर
नवी दिल्ली – देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. रविवारी 63,489 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. सलगा नवव्या दिवशी 60,000 पेक्षा जास्त नवीन रूग्णांची नोदं झाली आहे. त्याचबरोबर संक्रमित रुग्णांची संख्या 25 लाख 89 हजारांवर पोहोचली आहे. परंतु चांगली गोष्ट अशी आहे की संसर्गातून बरे होणार्या रूग्णांची संख्या 18 लाखाहून अधिक झाली आहे आणि तपासण्या चाचण्यात देखील वाढ झाली आहे.
रविवारी सकाळी प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 944 जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या 49 हजार 980 वर पोहचली आहे. देशात एकूण कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 25 लाख 89 हजार 682 वर पोहचली आहे ज्यामध्ये 6 लाख 77 हजार 444 रूग्णांवर उपचार चालू आहे आणि आतापर्यंत 18 लाख 62 हजार 258 रूग्ण बरे झाले आहेत.
आरोग्य विभागाच्या आकडेवारी नुसार रविवारपर्यत 18 लाख 62 हजार 258 रूग्ण बरे झाले असून देशात रूग्ण बरे होण्याचा दर 71.91 टक्क्यांवर पोहचला आहे. तसेच मृत्यूदरात देखाल घट झाली असून मृत्यू दर 1.93 टक्के आहे.
आयसीएमआरच्या आकडेवारी नुसार देशभरात 15 आॅगस्टपर्यंत एकूण 2,93,09,703 कोरोना चाचण्या झाल्या असून, शनिवारी एका दिवसात 7 लाख 46 हजार 608 नमून्यांची चाचणी घेण्यात आली आहे.