मुंबई – चिनी लष्करासोबत निर्माण झालेल्या तणावाला हिंसक वळण लागले असून संघर्षात भारतीय लष्कराचा एक अधिकारी आणि 20 जवान शहीद झाले आहेत. यावरून आता विरोधकांनी मोदी सरकारवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सीमेवर जे घडलं, त्यासाठी आपण जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी किंवा राहुल गांधींना जबाबदार धरू शकत नाही, असे मत मांडले आहे.
संजय राऊत म्हणाले कि, जे काही लडाखमधील सीमेवर घडले, त्यासाठी आपण जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी वा राहुल गांधी यांना जबाबदार धरू शकत नाही. २० जवान शहीद झाले, त्यासाठी आपण सर्व जबाबदार आहोत. जो काही निर्णय पंतप्रधान घेतील, त्याला सर्व पक्ष पाठिंबा देतील. पण, चुकीचे काय झाले हे त्यांनी देशातील जनतेला सांगायला हवे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
We can’t hold Jawaharlal Nehru, Indira Gandhi or Rahul Gandhi responsible for whatever happened at the border. We all are responsible for martyrdom of 20 jawans. All parties will support whatever decision PM takes but he should tell ppl what went wrong: Shiv Sena MP Sanjay Raut pic.twitter.com/EAZ76SgBxK
— ANI (@ANI) June 17, 2020
दरम्यान, याआधी संजय राऊत यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदीजी, या संघर्षाच्या काळात देश तुमच्या पाठीशी आहे, मात्र खरं नेमकं आहे तरी काय?? देशाला सत्य जाणून घ्यायचंय तुम्ही काहीतरी बोला, अशी विनंतीही केली होती.