IND vs SA 2nd Test, Mohammed Siraj Record : केपटाऊन कसोटीत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने घातक गोलंदाजी केली. मोहम्मद सिराजने 9 षटकात 15 धावा देत 6 विरोधी फलंदाजांना आपला बळी बनवले आहे. मोहम्मद सिराजने पहिल्याच सत्रात 5 बळी घेत इतिहास रचला. याशिवाय या गोलंदाजाने आणखी अनेक विक्रम आपल्या नावावर केले.
सर्वात कमी धावा देत 5 विकेट
जसप्रीत बुमराहने भारताकडून कसोटी सामन्यात सर्वात कमी धावा देत 5 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. जसप्रीत बुमराहने 2019 साली वेस्ट इंडिजविरुद्ध 7 धावांत 5 फलंदाज बाद केले होते. त्याचबरोबर मोहम्मद सिराज या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. केपटाऊनमध्ये आज मोहम्मद सिराजने 15 धावांत 6 खेळाडू बाद केले. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्यानंतर भारताचा माजी दिग्गज गोलंदाज जवागल श्रीनाथ तिसऱ्या क्रमांकावर आहे. जवागल श्रीनाथने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 21 धावांत 5 बळी घेतले. हा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 1996 साली खेळला गेला होता.
IND vs SA 2nd Test Day 1 : दक्षिण आफ्रिकेच्या नावावर सर्वात लाजिरवाण्या विक्रमाची नोंद…
बांगलादेशविरुद्ध इशांत शर्माने 22 धावांत 5 बळी घेतले होते. भारत आणि बांगलादेश यांच्यातील हा सामना 2019 मध्ये कोलकाता येथे झाला होता. याशिवाय मदन लालने 1981 साली इंग्लंडविरुद्ध 23 धावांत 5 विकेट घेतल्या होत्या. भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा सामना 1981 मध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला होता.
दक्षिण आफ्रिकेतील सर्वोत्तम गोलंदाजी…
सिराजने दक्षिण आफ्रिकेतील सर्वोत्तम स्पेल गोलंदाजांच्या यादीतही स्थान मिळवले. शार्दुल ठाकूर या बाबतीत आघाडीवर आहे, ज्याने 2022 मध्ये जोहान्सबर्गच्या मैदानावर 61 धावांत सात विकेट घेतल्या होत्या. हरभजन सिंगनेही येथे 120 धावांत सात बळी घेतले आहेत. आता सिराजने फक्त 15 धावांत सहा बळी घेतले आहेत. अनिल कुंबळेने 1992 साली (53 धावा) , जवागल श्रीनाथने 2001 साली (76 धावा) तर रवींद्र जडेजाने 2013 साली (138 धावा) प्रत्येकी 6 गडी बाद केले होते. मात्र, या सगळ्यांपेक्षा सिराजची कामगिरी विक्रमी ठरली.
Mohammed Siraj’s SIX is arguably the best Test performance by an Indian bowler in South Africa #SAvIND
Long list ▶️ https://t.co/gH5KUTwBt8 pic.twitter.com/0lCMwt44Vn
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) January 3, 2024
दरम्यान, मालिकेतील पहिला सामना डावाच्या फरकाने गमावल्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यात दमदार सुरुवात केली आहे. प्रथम गोलंदाजी करताना टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा डाव 55 धावांवर आटोपला. भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यातील कोणत्याही डावातील ही सर्वात लहान धावसंख्या आहे. याआधी 2021 मध्ये वानखेडे मैदानावर न्यूझीलंडचा संघ भारतीय गोलंदाजांनी 62 धावांत गारद केला होता. 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ नागपुरात 79 धावांवर तर 2021 मध्ये अहमदाबादमध्ये इंग्लंडचा संघ 81 धावांवर रोखला गेला होता.