IND vs ENG 5th Test : जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात पुनरागमन करेल. धरमशाला येथे 7 मार्चपासून खेळल्या जाणाऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये मोठे बदल पाहायला मिळतील. या सामन्यात केएल राहुल पुन्हा दिसणार नाही. त्याचवेळी देवदत्त पडिक्कलला पदार्पणाची संधी मिळू शकते.
धर्मशाला कसोटीसाठी जसप्रीत बुमराहचे संघात पुनरागमन झाल्याने टीम इंडिया नव्या अडचणीत सापडली आहे. जसप्रीत बुमराह प्लेइंग 11 मध्ये खेळणार हे निश्चित आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाला कुलदीप यादव आणि आकाश दीप, मोहम्मद सिराज या तीनपैकी एकाला प्लेइंग 11 मधून वगळावे लागेल.
भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेत टीम इंडियाने चौथा सामना जिंकून मालिकेत 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. आता संघाची नजर पाचव्या कसोटीवर आहे. गुरुवारी बीसीसीआयने या सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली, ज्यामध्ये वेगवान गोलंदाज बुमराहचे पुनरागमन झाले. त्याचवेळी देवदत्त पडिक्कलचा संघात समावेश करण्यात आला. तो सध्या फॉर्मात आहे आणि पदार्पण करू शकतो.
पाचव्या कसोटीत सिराजचा होणार पत्ता कट…
या सामन्यात भारताच्या गोलंदाजीत महत्त्वाचे बदल पाहायला मिळतील. वास्तविक, चौथ्या कसोटीत कर्णधार रोहित शर्माने बुमराहच्या जागी आकाश दीपला संधी दिली. पदार्पणाच्या कसोटीतच त्याने तीन विकेट घेत छाप पाडली. तर मोहम्मद सिराजला केवळ दोन विकेट मिळाल्या. त्याला दुसऱ्या डावातही यश मिळाले नाही. या मालिकेत सिराजने तीन सामने खेळले. त्याने राजकोट कसोटीत चार आणि रांचीमध्ये दोन विकेट्स घेतल्या. अशा स्थितीत धर्मशाला कसोटीत वेगवान गोलंदाज सिराजला वगळले जाऊ शकते. अशा स्थितीत भारत दोन वेगवान गोलंदाज आणि तीन फिरकी गोलंदाजांसह जाऊ शकतो.
तसेच कुलदीप यादव आणि आकाशदीप हे दोन्ही खेळाडू रांची कसोटीत भारताच्या विजयाचे हिरो ठरले आहेत, त्यामुळे प्लेइंग इलेव्हन निवडणे कर्णधार रोहित शर्माला सोपे जाणार नाही. मात्र, धरमशालाची खेळपट्टी लक्षात घेता टीम इंडियाही तीन वेगवान गोलंदाजांसह सुध्दा मैदानात उतरू शकते.
जसप्रीत बुमराहला रांची कसोटीतून विश्रांती देण्यात आली होती. या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या जागी आकाशदीपला पदार्पणाची संधी मिळाली. रांचीच्या निर्जीव खेळपट्टीवर आकाशदीपने इंग्लंडचे पहिले तीन विकेट घेत पाहुण्या संघाला बॅकफूटवर ढकलून आश्चर्यकारक कामगिरी केली. कुलदीप यादवने दुसऱ्या डावातही अशीच कामगिरी केली. कुलदीप यादवने अवघ्या 22 धावांत तीन बळी घेतले. याचा परिणाम म्हणजे रांची कसोटी जिंकून भारताने मालिकेत अभेद्य आघाडी घेतली.
कुलदीप यादवलाही वगळण्याची दाट शक्यता
आर अश्विन रांचीमध्ये 100 वा कसोटी सामना खेळणार आहे. चेंडूशिवाय रवींद्र जडेजा फलंदाजीतही महत्त्वाचे योगदान देत आहे. या दोन्ही खेळाडूंपैकी एकालाही वगळण्याचा धोका संघ व्यवस्थापन घेणार नाही. टीम इंडिया कुलदीप यादवलाही वगळण्याची दाट शक्यता आहे. बुमराह, सिराज आणि आकाशदीप हे वेगवान गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व करताना दिसून येतील.
रजत पाटीदार प्लेइंग 11 मधून होऊ शकतो बाहेर..
रजत पाटीदारला विशाखापट्टणम कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली. पहिल्या डावात 32 आणि दुसऱ्या डावात 9 धावा केल्यानंतर तो बाद झाला. यानंतर त्याला राजकोटमध्ये आणखी एक संधी देण्यात आली. रजत पुन्हा एकदा अपयशी ठरला. पहिल्या डावात त्याला केवळ पाच धावा करता आल्या होत्या. दुसऱ्या डावात खातेही उघडता आले नाही. चौथ्या सामन्यात रजतने पहिल्या डावात 17 धावा केल्या आणि दुसऱ्या डावात तो शून्यावर बाद झाला. अशा स्थितीत सहा डावांत एकही अर्धशतक न झळकावलेल्या रजतला बाहेर बसावे लागू शकते.
पडिक्कल जबरदस्त फॉर्मात…
रजतच्या जागी कर्नाटकचा डावखुरा फलंदाज देवदत्त पडिक्कलला संधी मिळू शकते. पडिक्कलने 31 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 44.54 च्या सरासरीने 2,227 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने सहा शतके आणि 12 अर्धशतके केली आहेत. पडिक्कलने गेल्या 11 डावांमध्ये पाच शतके झळकावली आहेत. त्याने कर्नाटकसाठी तीन आणि इंडिया-अ साठी दोन शतके झळकावली आहेत. त्याचा उत्कृष्ट फॉर्म पाहून रोहित शर्मा त्याला रांची कसोटीत रजत पाटीदारच्या जागी संधी देऊ शकतो.