IND vs AUS 5th T20 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा T20 सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाने मालिकेत आधीच ३-१ अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. भारताने चौथा टी-20 सामना 20 धावांनी जिंकला. टीम इंडियाचे गोलंदाज आणि फलंदाज उत्कृष्ट फॉर्ममध्ये असल्याचे दिसत आहे.
भारत विरुद्धच्या पाचव्या T20 सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार मॅथ्यू वेडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. त्यामुळे आता भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली आहे.
भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. दीपक चहरला वैद्यकीय कारणामुळे घरी परतावे लागले. प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याच्या जागी अर्शदीप सिंगला संधी मिळाली आहे.
दोन्ही संघांचे प्लेइंग-11
भारत : यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार, अर्शदीप सिंग.
ऑस्ट्रेलिया : ट्रॅव्हिस हेड, जोश फिलिप, बेन मॅकडरमॉट, आरोन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, मॅथ्यू वेड (wk/c), बेन डोर्सी, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, तन्वीर संघा.