Rinku Singh Last Ball Six : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना अतिशय अतितटीचा झाला. 209 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडियाला एका वेळी चार चेंडूत फक्त दोन धावाच करायच्या होत्या, पण लागोपाठ तीन विकेट पडल्या आणि सामना फिरला. आता शेवटच्या चेंडूवर भारताला एका धावेची गरज होती. समोर रिंकू सिंग होता आणि त्याने शॉन अॅबॉटच्या चेंडूवर अप्रतिम षटकार ठोकला. येथे अंपायरने एक निर्णय दिला आणि त्यानंतर क्रिकेट चाहत्यांना एका रंजक नियमाची माहिती मिळाली.
पंचांच्या निर्णयानंतर टीम इंडियाचा विजय निश्चित झाला पण रिंकू सिंगचा षटकार वाया गेला. शॉन अॅबॉटचा चेंडू नो-बॉल निघाल्यामुळे हा प्रकार घडला. क्रिकेटमध्ये नो-बॉलवरही षटकार मोजला जातो, मग रिंकू सिंगचा शेवटचा षटकार का मोजला गेला नाही? या प्रश्नाचे उत्तर क्रिकेट चाहत्यांच्या मनात घोळत राहिले. तर जाणून घेऊया, याबाबत….
#INDvAUS 1st T20 : सूर्यकुमारनं मोडला रोहित शर्माचा विक्रम; कोहलीपेक्षा फक्त दोन पावले मागे…
खरे तर सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर रिंकू सिंगने षटकार ठोकला तेव्हा भारतीय संघाला विजयासाठी फक्त एका धावेची गरज होती. आता शॉन अॅबॉटचा चेंडू नो-बॉल असल्याने चेंडूच्या आधीच भारताला अतिरिक्त धाव मिळाली होती. म्हणजे भारतीय संघ जिंकला होता. अशा स्थितीत या षटकाराला महत्त्व नव्हते. यामुळेच या सामन्यातील शेवटचा चेंडू आणि शेवटचा शॉट(फटका) नाकारण्यात आला. होय, जर भारताला येथे विजयासाठी दोन धावांची गरज असती, तर रिंकू सिंगचा षटकार (म्हणजेच 6 धावा) हा धावसंख्येत मोजला गेला असता.
सूर्याच्या खेळीने इंग्लिसचे शतकी खेळी व्यर्थ…
या सामन्यात जोस इंग्लिसने 50 चेंडूत केलेल्या 110 धावांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने 208 धावांची मोठी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात सूर्यकुमार यादवच्या 40 चेंडूत 82 धावांच्या स्फोटक खेळीमुळे भारताने एक चेंडू बाकी असताना लक्ष्य गाठले. येथे इशान किशननेही 39 चेंडूत 58 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.