India vs Australia 1st T20 Cricket Match : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादवने टीम इंडियाची धूरा संभाळलीच त्यासोबत संघाला विजयाच्या उंबरठ्यावरही नेले. विशाखापट्टणम येथे झालेल्या या सामन्यात सूर्यकुमार यादवने 42 चेंडूत 80 धावांची धडाकेबाज खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. त्याची त्यामुळे ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणूनही निवड झाली. या दमदार खेळी आणि उत्कृष्ट नेतृत्वानंतर सूर्यकुमार काय म्हणाला? जाणून घ्या…
सूर्यकुमार म्हणाला, ‘संघातील सदस्यांनी मैदानावर ज्या प्रकारे कामगिरी केली त्यामुळे मी खूप खूश आहे. आम्ही दडपणाखाली होतो, पण आमचा परतण्याचा मार्ग विलक्षण होता. कर्णधार म्हणून हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे, जेव्हाही तुम्ही क्रिकेट खेळता तेव्हा भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा विचार करता, परिपूर्ण होण्यासाठी थोडा वेळ लागेल पण मला ही संधी मिळाल्याचा खूप अभिमान आहे.
गोलंदाजांनी केले चांगले पुनरागमन…
सूर्या म्हणाला, ‘मला वाटलं इथे मैदानवर दव असेल, पण तसं नव्हतं. मैदान लहान असल्याने जास्त धावा होणार हे मला माहीत होते. सुरुवातीला ज्या पद्धतीने ते धावा करत होते, त्यावरून आम्हाला 230 धावांचे लक्ष्य गाठावे लागेल, असे वाटत होते. पण गोलंदाजांनी चांगलं पुनरागमन केलं . तीन वेगवान गोलंदाजांनी ज्या प्रकारे आम्हाला 16 षटकांनंतर खेळात परत आणले ती एक अविश्वसनीय कामगिरी होती. आम्हाला या सामन्यात सकारात्मक रहायचे होते आणि आम्ही तेच केले.
कर्णधारपदाची जबाबदारी सोडून खेळपट्टीवर आलो…
सुरुवातीच्या दोन विकेट झटपट पडल्यानंतरच्या स्थितीबदल बोलताना सूर्या म्हणाला, ‘या काळात मी किशनला एकच गोष्ट सांगितली. मी म्हणालो लक्ष्याचा विचार करू नको, फक्त फलंदाजी करत रहा. ड्रेसिंग रूममध्ये कर्णधारपदाची जबाबदारी सोडून मी मैदानावर आलो. मी फक्त माझ्या फलंदाजीचा आनंद घेण्याचा प्रयत्न केला.
रिंकू सिंगच्या धीरामुळे मला दिलासा मिळाला
सूर्याने स्वत: बाद झाल्यानंतर खेळपट्टीवर उपस्थित नवीन फलंदाजांना दिलेल्या संदेशाबाबतही सांगितले. तो म्हणाला, ‘मी त्याना खेळाला जास्त खोलात नेऊ नका असे सांगितले. या रोमांचक सामन्यात संघातील सदस्यानी ज्या प्रकारे संयम राखला, ते पाहणे खूप छान वाटले. रिंकू सिंगसाठी ही एक सामान्य परिस्थिती होती. शेवटच्या क्षणी त्याच्या सहनशीलतेने मलाही दिलासा मिळाला.
भारतानं 209 धावांच्या लक्ष्याचा केला पाठलाग…
भारत-ऑस्ट्रेलिया याच्यांतील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतीय संघानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाचा एक चेंडू राखून पराभव केला. गुरुवारी (23 नोव्हेंबर) विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 240 धावा केल्या, प्रत्युत्तरात भारतीय संघाने 8 गडी गमावून लक्ष्य गाठले. या सामन्यात सूर्यकुमार यादवने 42 चेंडूत 80 धावांची शानदार खेळी केली. ऑस्ट्रेलियासाठी या सामन्यात जोस इंग्लिसने 50 चेंडूत 110 धावा केल्या होत्या.