राजौरी/जम्मू – जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या पाच जवानांना लष्कर आणि पोलिसांनी शुक्रवारी सकाळी पुष्पहार अर्पण करून श्रद्दांजली वाहिली. काश्मीरातील ही चकमक 36 तास चालली होती. त्यात कॅप्टनसह पाच सैनिक शहीद झाले.
या शहीदांच्या पार्थिवावर आर्मी जनरल हॉस्पिटल राजौरी येथे लष्करातर्फे पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये जनरल ऑफिसर कमांडिंग रोमियो फोर्स आणि इतर अधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांनी शहीद सैनिकांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
ज्यांनी दहशतवाद्यांशी लढताना प्राणार्पण केले त्यात कर्नाटकातील मंगळूर भागातील कॅप्टन एमव्ही प्रांजल उत्तर प्रदेशातील आग्रा येथील कॅप्टन शुभम गुप्ता, पुंछ, जम्मू-काश्मीरमधील अजोटे येथील हवालदार अब्दुल मजीद, नैनिताल, भागातील लान्स नाईक संजय बिस्त आणि उत्तर प्रदेशातील अलिगड येथील पॅराट्रूपर सचिन लार यांचा समावेश आहे. शहीद झालेल्या जवानांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या मूळ गावी पाठवले जात आहेत.