IND vs AUS 1st T20I Match : विश्वचषक संपल्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिका सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना विशाखापट्टणम येथे खेळला गेला तर दुसरा सामना उद्या (दि.26,रविवार) तिरुअनंतपुरममध्ये होईल. भारताने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 2 विकेट राखून विजय मिळवून मालिकेची सुरुवात केली. पाच सामन्यांची ही मालिका आणि पहिल्याच सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंग यांच्यामुळे टीम इंडियाने विजय मिळवला, मात्र विजयानंतर बीसीसीआयने भारतीय संघाचा असा व्हिडिओ 👇👇👇👇 शेअर केला, जो पाहून चाहते संतप्त झाले.
A nail-biting finish but plenty of pleasant faces in and out of the dressing room in Vizag 😃👌
Some BTS from #TeamIndia‘s win against Australia in Vizag 📽️🏟️#INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/TL67wcXavQ
— BCCI (@BCCI) November 24, 2023
टीम इंडियाच्या सेलिब्रेशनने चाहते निराश…
भारतीय क्रिकेट चाहते संतापले आणि त्यांनी सोशल मीडियावर बीसीसीआयवर जोरदार टीका केली. 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू इतके आनंदी झाले की त्यांनी केक कापून विजय साजरा केला आणि बीसीसीआयनेही या सेलिब्रेशनचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. सेलिब्रेशनचा हा व्हिडिओ टीम इंडियाच्या चाहत्यांना आवडला नाही. ते निराश अन् संतप्त झाले आणि मग सोशल मीडियावर त्याने बीसीसीआयला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
बीसीसीआयवर उसळला चाहत्यांचा रोष…
भारतीय संघाच्या चाहत्यांनी लिहिले की, टीम इंडिया नुकतीच विश्वचषकाच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाली आहे, आणि टी-20 सामना जिंकल्यानंतर इतके सेलिब्रेशन का?
काही चाहते म्हणत आहेत की, असे शंभर सामने जिंकून काय होणार, विश्वचषक जिंकता आला पाहिजे, नाही तर काय उपयोग?
त्याचवेळी…आणखी एका चाहत्याने लिहिले की, सेलिब्रेशन तर असं करत आहेत, जस काय वर्ल्ड कपच जिंकला आहे.
तथापि, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, टीम इंडियाने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आणि त्यांनी 20 षटकात 3 गडी गमावून 208 धावा केल्या, ज्यामध्ये जोश इंग्लिसने 50 चेंडूत 110 धावा केल्या. मात्र, भारतीय क्रिकेट संघाने 19.5 षटकांत 8 विकेट्स राखून लक्ष्य गाठले आणि विजय मिळवला.