पुणे- बंगालच्या उपसागरात आलेल्या अम्फण या चक्री वादळामुळे पश्चीम बंगाल राज्यात विशेषतः कोलकत्ता येथे मोठे नुकसान होत आहे. याठिकाणी बचाव आणि मदत कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलातर्फे कार्य केले जात आहे.
मात्र या आपत्तीची व्याप्ती पाहता दलातर्फे अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात येत आहे. पुण्यातील एनडीआरएफच्या पाचव्या बटालियनच्या दोन तुकड्या या मदत करण्यासाठी तैनात करण्यात आली असून, त्याना हेलिकॉप्टर द्वारे बंगाल आणि ओडिशा येथे पोहचविले जाणार आहे. लवकरच ही तुकडी पुण्यातून रवाना होणार आहे.