इस्लामाबाद – इम्रान खान यांनी 9 मे रोजीच्या हिंसक आंदोलनाबद्दल पाकिस्तानच्या देशवासियांची माफी मागितली तरच त्यांच्याशी चर्चा केली जाईल, असे पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दर यांनी म्हटले आहे.
इम्रान खान यांच्याबरोबरच्या चर्चेचा प्रस्ताव सत्तारुढ आघाडी सरकारने कालच फेटाळून लावला होता. त्यानंतर दर यांनी चर्चेसाठी इम्रान खान यांच्यासमोर “माफी मागण्याची’ पूर्वअट ठेवली आहे.
सरकारबरोबरच्या चर्चेसाठी इम्रान खान यांनी आपल्या पक्षातील 7 नेत्यांची समिती नियुक्त केली आहे. 9 मे पूर्वी सरकारने प्रामाणिकपणे “पीटीआय’बरोबर चर्चा केली होती. निवडणुकीच्या तारखा वगळता अन्य सर्व मुद्द्यांवर सहमतीही झाली होती. शांततेने आंदोलन करण्याचा अधिकार म्हणजे हिंसाचार नव्हे, असे दर म्हणाले.
3 महापालिकांचा ताबा घेण्याचा प्रयत्न
उत्तर कोसोवोतील झेकान, लेपोसाविक, झुबिन पोतोक आणि मित्रोविका या चार महापालिकांमध्ये गेल्या महिन्यात निवडणुका झाल्या. या निवडणुकांवर स्थानिक बहुसंख्य सर्ब वंशियांनी बहिष्कार घातला होता. अल्पसंख्य अल्बानिया वंशियांचे प्रतिनिधी या महापालिकांवर निवडले गेले.
या चार महापालिकांपैकी झेकान, लोपोसाविक आणि झुबिन पोताक या महापालिकांचा ताबा सर्ब वंशियांनी घेण्याचा प्रयत्न केला. “नाटो’ सुरक्षा रक्षक आणि आणि कोसोवो पोलिसांना तेथे मोठा बंदोबस्त ठेवावा लागला होता. सुरक्षा रक्षकांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडालव्या लागल्या आणि स्प्रे गॅसचा वापरही करावा लागला.