Israel-Hamas War : इस्राइलवर हमासच्या दहशतवाद्यांनी ५ हजारपेक्षा जास्त रॉकेट हल्ले केले, त्यात 200 हून अधिक इस्रायली ठार झाले. 1000 हून अधिक लोक जखमी झालेअसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यातील युद्धाचे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई वाहतूक कंपनी एअर इंडियाने महत्वाचा निर्णय घेतला आहे.
Air India cancels flights to and from Tel Aviv till Oct 14
— Press Trust of India (@PTI_News) October 8, 2023
एअर इंडियाने इस्रायलला जाणारी सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. यावषीयीची माहित देतांना कंपनीकडून “आमच्या प्रवाशांच्या आणि क्रूच्या सुरक्षेसाठी, तेल अवीव (इस्रायल) वरून एअर इंडियाची उड्डाणे 14 ऑक्टोबरपर्यंत निलंबित राहतील,” असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. एअर इंडिया या कालावधीत कोणत्याही फ्लाइटच्या बुकिंगची पुष्टी करणार्या प्रवाशांना शक्य ती सर्व मदत करेल.” असेही सांगण्यात येत आहे.
दरम्यान, युद्धात आतापर्यंत इस्रायलच्या बाजूने 300 लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे 1590 लोक जखमी झाले आहेत. तर गाझामध्ये या युद्धामुळे 232 लोकांचा मृत्यू झाला आणि 1790 लोक जखमी झाले. समोर आलेल्या माहितीनुसार, हमासने सुमारे 164 इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवले आहे. इस्रायलच्या हद्दीत हमासच्या अनेक सैनिकांनी घुसखोरी केली. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्ध घोषित केले असून शत्रूंना याची मोठी किंमत चुकवावी लागेल असा इशारा दिला आहे.