मुंबई : भाजप नेते नारायण राणे यांनी सरकारवर हल्लाबोल केला. ‘एक शरद आणि शिवसेनेचे सगळे गारद’ अशी त्यांची स्थिती आहे.” असा टोला राणे यांनी शिवसेनेला लगावला.
“शिवसेनेची सत्ता असूनही शिवसेनेचे मंत्री आणि नेते यांचेच ऐकले जात नाही. महाविकास आघाडीत धुसफूस सुरु आहे. शिवसैनिकानाच कोणी विचारत नाहीत, अशी स्थिती आहे.”, अशी टीका राणे यांनी केली. आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत राणे बोलत होते.
दरम्यान, गणेशोत्सवामध्ये कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना बंदी घातली, तर आम्ही आंदोलन करु, असा इशारा देखील राणे यांनी दिला आहे.
राणे म्हणाले, कोकणी माणसांसाठी गणेशोत्सव हा महत्त्वाचा सण आहे. गणपती हे आमचे आराध्य दैवत आहे. कोकणात यायला कोकणी माणसाला बंदी घातलेले चालणार नाही.