नवी दिल्ली: काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. मोदींना कुटुंब नसल्यामुळे त्यांना त्याच महत्त्व नाही आणि मुल्यांची जाणही नाही, असे शर्मा म्हणाले. नरेंद्र मोदींनी राजीव गांधी यांच्यावर टीका केल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी मोदींवर टीकांचा सपाटा लावला आहे.
मोदींना कुटुंब असतं तर तेही आपल्या कुटुंबाला घेऊन दौऱ्यावर गेले असते. मात्र त्यांना कुटुंबच नसल्यामुळे घर काय असतं हे त्यांना माहितच नाही. कुटुंब नसल्यामुळे कौटुंबिक मुल्यांविषयी आदरही नाही असंही त्यांनी मोदींना सुनावलं.
काय म्हणाले होते नरेंद्र मोदी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका प्रचार सभेत बोलताना राहुल व प्रियांकांचे वडिल दिवंगत राजीव गांधी यांच्यावर एक आक्षेपार्ह टिपण्णी केली होती. स्वताला मिस्टर क्लीन म्हणणारे पंतप्रधान एक नंबरचे भ्रष्टाचारी ठरले असे विधान मोदी यांनी केले होते. तसेच नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांच्यावर भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस विराट आपल्या कौटुंबिक सहलीसाठी वापरल्याचा आरोप लावला होता.
#WATCH Anand Sharma, Congress on PM Modi's comment on INS Viraat: Any PM would do so but this PM has no family,if he had family then he would also be going there, but he goes alone because he has no connect with a family or any respect for family values. (09/05/2019) pic.twitter.com/N9sKN7iQ2D
— ANI (@ANI) May 10, 2019