ग्वाल्हेर – शेवटच्या दोन टप्प्यात मतदान होण्याचे बाकी असताना, सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी सभांचा धडाकाच लावला आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना आपल्या एका सभेत भाषण उरकते घेत काढता पाय घेण्याची वेळ आली. मध्य प्रदेशमध्ये सभेसाठी गेलेल्या स्मृती इराणी यांच्या सभेला गर्दीच जमली नसल्याचे समोर आले आहे.
ग्वाल्हेर मतदारसंघातील विवेक शेजवलकर यांच्या प्रचारासाठी स्मृती इराणी डबरा येथे आल्या होत्या. सभेला संबोधित करण्यासाठी इराणी पोहोचल्यावरही सभेला गर्दीच झाली नाही. अर्ध्यापेक्षा जास्त खुर्च्या रिकाम्या दिसताच स्मृती इराणी यांनी अर्धवट भाषण देऊन दिल्लीकडे रवाना झाल्या. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत रिकाम्या खुर्च्याचा फटका याआधीसुद्धा अनेक नेत्यांना बसला आहे. खुद्द मोदींच्या सभेतून लोक बाहेर पडले होते.