भाजपचे नेते अवधूत वाघ यांची राज्य सरकारवर टीका
मुंबई : राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आल्यानंतर लगेच विविध मागण्यासाठी झालेल्या आंदोलनातील आंदोलकांवर असलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली जात आहे. मराठा आंदोलक, धनगर आंदोलक, नाणार प्रकल्प आंदोलक तसेच भीमा कोरेगाव प्रकरणी केवळ संशयित असणाऱ्यांवरील सर्व खटले आणि गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी राजकीय स्तरातून होत आहे. तसेच काही गुन्हे मागेदेखील घेतले जात आहेत. आता याचवरून भाजपने राज्य सरकारवर टीका केली आहे.
नशीब…
कसाबला फाशी झाली
नाहीतर त्याच्यावरचे गुन्हेही या महाराष्ट्र सरकारने कदाचित मागे घेतले असते….— Avadhut Wagh (@Avadhutwaghbjp) December 4, 2019
भाजपचे नेते अवधूत वाघ यांनी महाविकासआघाडीवर खोचक टीका करणारे ट्विट केले आहे. नशीब…कसाबला फाशी झाली. नाहीतर त्याच्यावरचे गुन्हेही या महाराष्ट्र सरकारने कदाचित मागे घेतले असते, असे ट्विट वाघ यांनी केले आहे.
दरम्यान आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या अशी मागणी जरी होत असली तरी राज्य सरकारने अद्याप कोणतेही गुन्हे मागे घेतले नाहीत. त्याबाबत विचार करून आणि योग्य शहानिशा करूनच निर्णय घेऊ. जो दोषी असेल त्याची मात्र गय केली जाणर नाही, असे सरकारकडून सांगण्यात येत आहे.