सातारा -सातारा शहराच्या हद्दवाढीतील भागाच्या पायाभूत सुविधांसाठी राज्य शासनाने निधी दिला आहे. त्या निधीचा योग्य वापर झाला पाहिजे. या निधीची पालिकेने उधळपट्टी केल्यास आम्ही राज्य सरकार किंवा नगर विकास विभागाकडे तक्रार करू, असा स्पष्ट इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला आहे. सातारा शहराची विकास कामे ही लोकांसाठी होतात का ठेकेदारांसाठी, असा टोलाही त्यांनी सातारा विकास आघाडीला लगावला आहे
येथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या संवाद मेळाव्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, “पालिकांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाने जेथे स्थगित केल्या तेथून सुरू करायची परवानगी दिली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकतीच जलमंदिरात नगरसेवक आणि पालिका प्रशासनाची बैठक घेतली. उदयनराजेंच्या या भूमिकेवर आणि बैठकीसंदर्भात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कडाडून टीका केली.
ते म्हणाले, “”ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सातारा पालिकेची निवडणूक स्थगित झाली आणि उदयनराजे नेहमीप्रमाणे साताऱ्यातून गायब झाले. आता निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने त्यांना विकास कामांची आठवण झाली आहे. बैठकीद्वारे कामे तातडीने करा अशा सूचना
रस्ते लोकांसाठी की ठेकेदारांसाठी?
पावसाळ्याच्या तोंडावर साताऱ्यातील रस्ते होतात, ते लोकांसाठी होतात का ठेकेदारांसाठी असा प्रश्न शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपस्थित केला. घंटागाडीमध्येसुद्धा मोठा भ्रष्टाचार झाला असून मर्जीतल्या ठेकेदारांसाठी ठराविक पदाधिकाऱ्यांची माणसे बसवून केवळ धनप्राप्ती झाली पाहिजे, असा उद्योग सुरू असल्याची जोरदार टीका त्यांनी केली.