पुढील महिन्यात १६ ऑक्टोबर पासून टी-२० विश्वचषक २०२२ ला सुरुवात होणार आहे. यंदाची विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये खेळवली जाणार आहे. आशिया खंडातील खेळपट्ट्यांपेक्षा ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या पूर्णपणे वेगळ्या असतात. त्यामुळे सध्या सर्वच संघ मुजबूत टीम बनवण्यासाठी तयारीला लागलेले आहेत. तत्पूर्वी उद्यापासून म्हणजे पुढील महिन्यापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमांमध्ये ( Cricket Rules ) मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. आयसीसीने क्रिकेटच्या काही नियमांत ( Cricket Rules ) बदल केले असून ते १ ऑक्टोबर पासून लागू होणार आहेत. हे नियम आगामी काळात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी देखील लागू होणार आहे.
काय आहेत नवीन बदल?
एखादा फलंदाज झेलबाद झाला तर मैदानावर येणार नवीन फलंदाज स्ट्राईकवर राहील ( Cricket Rules )
पहिल्यांदा क्रिकेटमध्ये एखादा फलंदाज झेलबाद झाला मात्र झेल घेण्यापूर्वी त्याने यशस्वीरीत्या स्ट्राईक बदलले असेल तर नवीन येणाऱ्या फलंदाजाला स्ट्राईक घेण्याची गरज पडत नव्हती. मात्र आता नवीन नियमानुसार मैदानात येणार फलंदाज हाच स्ट्राईकवर राहील. हा नियम आयपीएल स्पर्धेत यापूर्वीच लागू करण्यात आलेला आहे.
कोरोनामुळे चेंडूला लाळ लावण्यावर निर्बंध, मात्र आता कायमची बंदी ( Cricket Rules )
सामन्यात चेंडू थोडा जुना झाल्यानंतर त्याला चकाकी यावी म्हणून पूर्वी खेळाडू लाळेचा वापर करायचे. मागील दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे चेंडूला लाळ लावण्यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. मात्र आता नवीन नियमानुसार चेंडूला लाळ लावण्यावर कायमची बंदी घालण्यात आली आहे. याऐवजी खेळाडू घामाचा वापर करू शकतात. कारण त्याबाबत आयसीसीने कोणतेही बंधन घातलेले नाही.
फलंदाजाने खेळपट्टीवर हजर होण्याच्या वेळेत बदल ( Cricket Rules )
एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज खेळपट्टीवर येण्यास कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३ मिनिटांचा वेळ मिळायचा. मात्र त्यात आता बदल करण्यात आलेले आहेत. नवीन नियमानुसार नव्या फलंदाजाला कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये २ मिनिटांत तर टी-२० क्रिकेटमध्ये ९० सेकंदात खेळपट्टीवर हजर व्हावे लागणार आहे. असे न झाल्यास विरोधी कर्णधार फलंदाज आऊटची अपील करू शकतात.
चेंडू खेळण्याबाबत फलंदाजाच्या अधिकाराबाबत नियम ( Cricket Rules )
फलंदाजाने चेंडू खेळताना तो खेळपट्टीवर असणे आवश्यक आहे. एखादा चेंडू खेळण्यासाठी फलंदाज जर खेळपट्टी सोडून बाहेर गेला तर तो बॉल डेड ठरवला जाईल. किंवा फलंदाजास खेळपट्टी सोडण्यास भाग पडणारा असा कोणताही चेंडू हा नो बॉल ठरवला जाईल. कारण अनेकवेळा गोलंदाजाच्या हातातून निसटलेला चेंडू फलंदाज खेळपट्टीच्या बाहेर पाठलाग करून फाटकावण्याचा प्रयत्न करतात. ( ICC New rules will come into effect in cricket from October 1 T20 World Cup 2022 )
गोलंदाजावरील बंधनाबाबत नियम ( Cricket Rules )
चेंडू टाकताना गोलंदाजाने कोणत्याही प्रकारच्या अनैतिक हालचाली केल्या किंवा आपल्या बॉलिंग ऍक्शन मध्ये बदल करायचा प्रयत्न केल्यास तो चेंडू पंचांकडून डेड बॉल ठरवला जाईल. त्याशिवाय फलंदाजी संघाला ५ धावांची पेनल्टी दिली जाणार आहे.
क्षेत्ररक्षणाबाबत नियम ( Cricket Rules )
टी-२० प्रमाणेच आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये निर्धारित षटके वेळेवर पूर्ण न केल्यास क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला शेवटच्या काही षटकांसाठी ३० यार्डांच्या वर्तुळात अतिरिक्त क्षेत्ररक्षक ठेवावा लागेल. आशिया चषक २०२२ च्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान याचा अनुभव आपण घेतला होता.