नवी दिल्ली : देशात मागील काही दिवसांपासून लव्ह-जिहादचा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चिला गेला आहे. या वरून देशभरात रान उठले होते. दरम्यान, उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे, एक मुस्लिम तरुणी भगवान श्रीकृष्णाची भक्ती करायची म्हणून तिला तिच्या नवऱ्याने तीन तलाक दिल्याची घटना घडली आहे.
बरेलीच्या फरीदपूर पोलीस ठाण्याच्या ढाकनी राजपुरा गावात राहणारी शहनाज हिचा 2018 मध्ये निकाह झाला होता. ती लहानपणापासूनच भगवान श्रीकृष्णाची भक्त होती आणि त्यांची पूजा करत असे. शहनाजचे कुटुंबीय याला विरोध करत होते आणि म्हणायचे की त्यांच्या धर्मात पूजा केली जात नाही.शहनाजने कोणाचेही ऐकले नाही आणि लग्नानंतरही ती भगवान श्रीकृष्णाची भक्त राहिली. दुसरीकडे ही बाब सासरच्या घरात कळताच एकच गोंधळ उडाला.
पती आणि सासरच्यांनी तिला पूजा करताना पाहिल्यानंतर एकच खळबळ उडाली. हे पाहून पतीने तिला ट्रिपल तलाक दिला. मुलीने पाटील समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी त्याने तिला अँशब वापरले. सासरच्या लोकांनीही तिला समजून घेतले नाही. मात्र एवढ्या सगळ्यात तिचा बालपणीचा मित्र पवन कुमार याने तिला साथ दिली. तरुणीने तिची व्यथा मित्राला सांगितली तेव्हा त्याने तिला समजून घटले. या मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले आणि दोघांनी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोघेही बरेलीला पोहोचले आणि अगस्त आश्रमात गेले आणि हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केले.
लग्न झाल्यानंतर आता शहनाजने आता तिचे नावही बदलले आहे. शहनाजचे बदलले नाव आता आरोही असे आहे. शहनाजने सांगितले की, आता तिला आरोही या नावाने हाक मारावी. तरुणीने पोलीस प्रशासनाला पत्र लिहून सुरक्षेची विनंती केली आहे. कुटुंबाकडून जीवाला धोका असल्याचे मुलीचे म्हणणे आहे.