मुंबई : पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरण आणि त्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांमुळे राज्याचं राजकारण गल्ली ते दिल्ली ढवळून निघालं आहे. भाजपने आक्रमक पावित्रा घेत गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. हे सगळ घडत असताना शिवसेना नेते संजय राऊत यांचं एक ट्विट चर्चेचा विषय ठरलं आहे.
संजय राऊत यांनी रविवारी सकाळीच एक ट्वीट केलं आहे. त्यांनी नेहमीप्रमाणेच शायरीतून त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यामुळं त्यांच्या ट्वीटचा नेमका रोख कुणाकडे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. “हमको तो बस तलाश नए रास्तों की, हम मुसाफिर ऐसे जो मंजिल से आयए है, अस ट्विट राऊत यांनी केलं आहे.
मुंबई पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आलेले परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मोठा आरोप केला होता. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते असा मोठा आरोप केला होता. त्यावरून राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. यातच राऊत यांचं हे ट्विट आलं आहे.