मुंबई – मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीरसिंह यांनी गृहमंत्र्यांनी वाझे यांना शंभर कोटी रूपये कलेक्शनचा जो आदेश दिल्याचे पत्र दिले आहे, त्या प्रकरणात कॉंग्रेसने स्पष्ट भूमिका घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुंबईतील प्रदेश कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांनी केली आहे.
परमवीरसिंह जे काही म्हणत आहेत त्यात जर तथ्य असेल तर या विषयी शरद पवारांना प्रश्न विचारला पाहिजे. कारण राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे तेच प्रमुख शिल्पकार मानले जातात, असेही निरूपम यांनी म्हटले आहे.
संजय निरूपम यांनी कायमच राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर विशेषत: शिवसेनेवर यापुर्वीही आगपाखड केली आहे. आता त्यांना हा नवीन मुद्दा मिळाला असून त्यामुळे त्यांच्या या मुद्द्याला महत्व दिले जात आहे.