नवी दिल्ली : हिंदु, मुस्लीम आणि पाकिस्तान हे तीनच शब्द या सरकारला माहित आहेत. त्यावरच त्यांची धोरणे ठरत आहेत. त्यांची वक्तव्ये आणि कृती त्याच भोवती फिरत आहे, असे प्रतिपादन राष्ट्र मंचचे संस्थापक आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी केले.
जर सरकारलाच समाजात धर्माच्या नावावर फूट पाडता येते यावर विश्वास असेल तर हिंदुत्ववादी शक्तीच्या नावावर ते मतांचे ध्रुवीकरण करू शकतात. त्यासाठी ते जनतेत गैरसमज पसरवून गोंधळ माजवू शकतात. मात्र त्यांचे हे डाव जनतेने यशस्वी होऊ देऊ नयेत, असे ते म्हणाले. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सिन्हा बोलत होते.
Mumbai: NCP Chief Sharad Pawar,former Union Minister Yashwant Sinha,Vanchit Bahujan Aghadi’s Prakash Ambedkar and other leaders at Gateway of India during ‘Gandhi Shanti Yatra’, a protest against #CitizenshipAmendmentAct and #NationalRegisterofCitizens pic.twitter.com/gDG6otbWxf
— ANI (@ANI) January 9, 2020
देशात सरकारने अघोषित आणीबाणी लादली आहे. सुधारित नागरिकत्व कायदा (का), एनआरसी आणि एनपीआर यांच्या विरोधातील शांततापूर्ण निदर्शने चिरडण्यासाठी हिंसाचार घडवला. ही यापुर्वी लादलेल्या आणीबाणीपेक्षा ही आणीबाणी अधिक घातक आणि फसवी आहे. कारण देशाचे अधार्मिक विभाजन करण्याचा डाव त्यामागे आहे, असे ते म्हणाले.
सरकारच्या गैरकृत्याचा पाढा वाचण्यासाठी आणि सरकारच्या अतिरेकी प्रचाराला युवकांनी बळी पडू नये म्हणून सिन्हा देशव्यापी यात्रा गुरूवारपासून (दि. 9) काढत आहेत. याची सुरवात मुंबईत होत आहे. का कायदा परत घ्यावा, देशव्यापी एनआरसी घेणार नाही, अशी घोषणा संसदेत करावी आणि आधारमुळे देशव्यापी रहिवाशी नोंद झाल्यामुळे एनपीआर राबवू नये अशा मागण्या राष्ट्रमंच, फ्रेंडस् ऑफ डेमॉक्रॉसी, शेतकरी जागरण मंच यांनी केली आहे.
वाजपेयी सरकारच्या काळात मांडलेले मूळ विधेयक हे सरकार लपवत आहे. एनपीआर कॉंग्रेसने आणली आणि आता त्याचा विरोध करत असल्याचा अपप्रचार हे सरकार करत आहे, असे ते म्हणाले.