नवी दिल्ली – ‘तुमच्यात जर प्रचंड इच्छाशक्ती असेल तर शेवटच्या क्षणाला विजय खेचुन आणू शकता’ या वाक्यचं उत्तम उदाहरण रिंकू सिंग या खेळाडूने दाखवून दिले आहे.रविवारी रात्री कोलकाता नाईटस रायडर विरुद्ध गुजरात टायटन्स असा सामना रंगला याच सामन्यात केकेआरचा खेळाडू रिंकू सिंगने एक ऐतिहासिक खेळी खेळली.टीमला गरज असताना मोक्याच्या क्षणी मैदानात येऊन सलग पाच षटकार ठोकत रिंकूने पूर्ण डावचा पलटून टाकला.
तर झालं असं शेवटच्या पाच चेंडूंमध्ये केकेआरला विजयासाठी 28 धावांची गरज होती.असे असताना,रिंकू सिंगने सलग पाच षटकार मारत कोलकाता नाईट रायडर्सला गुजरात टायटन्सवर तीन विकेट्सने विजय मिळवून दिला.आणि स्टेडियम मधील संपूर्ण प्रेक्षकांनी रिंकूवर कौतुकाचा वर्षाव केला.परंतु याच रिंकू सिंगचा इथंपर्यंत पोहोचण्याचा प्रवास कसा आहे. या बद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
‘क्रिकेट’ खेळायचा म्हणून व्हायची मारहाण
रिंकूचा जन्म 12 ऑक्टोबर 1997 रोजी अलिगढ, उत्तर प्रदेश येथे झाला.आई,वडील आणि पाच भावंड असे त्याचे कुटुंब.रिंकूच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने ते गॅस सिलिंडर डिलिव्हरी करत होते.तर दुसरीकडे रिंकूला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती.पण आपल्या मुलाने या खेळात वेळ वाया घालवू नये असे वडिलांना वाटायचे.क्रिकेट खेळायला जायचा म्ह्णून रिंकूला अनेकदा मारही खावा लागायचा.असे असतानाही रिंकूने क्रिकेट खेळणे सुरूच ठेवले.दिल्लीत एका क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये बाईक बक्षीस म्हणून मिळाली.ज्याने ती वडिलांना दिली. मात्र कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे रिंकूने नोकरी करण्याचा निर्णय घेतला.
प्रसंगी झाडू मारण्याचे काम केले-
रिंकूचे शिक्षण जास्त नसल्यामुळे त्याला नोकरी मिळण्यात अडचणी येत होत्या.अशा वेळी नाईलाजाने त्याला कोचिंग सेंटरमध्ये सफाई कामगाराची नोकरी करावी लागली. हे काम त्याला करावंसं वाटेना म्हणून थोड्याच दिवसात त्याने नोकरी सोडून दिली आणि पुन्हा एकदा क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला.मोहम्मद जिओशान आणि मसूद अमीन या दोन व्यक्तींनी रिंकू सिंगच्या कारकिर्दीला नवीन उड्डाण देण्यात खूप मदत केली असे रिंकू सांगतो.
2014 साली झाले टी 20 क्रिकेट मध्ये पदार्पण
2014 मध्ये रिंकूच्या मेहनतीला अखेर यश आले.उत्तर प्रदेशच्या लिस्ट-ए आणि टी-20 क्रिकेटमध्ये निवड झाली आणि क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली.पुढील दोन वर्षात लगेचच पंजाबविरुद्ध प्रथम श्रेणीमध्ये पदार्पण केले.त्यानंतर त्याने मागे वळून पहिलेच नाही.आयपीएल 2017 च्या लिलावात रिंकूला किंग्ज इलेव्हन पंजाबने 10 लाख रुपयांना विकत घेतले होते. मात्र, त्या मोसमात त्याला एकच सामना खेळायला मिळाला होता.परंतु काल झालेल्या सामन्यात रिंकूने त्याची क्षमता दाखवून दिली आहे. या पुढेही त्याने अशीच चमकदार कामगिरी केली तर त्याला टीम इंडियाकडून खेळण्यासाठी नक्कीच बोलावले जाऊ शकते.
“Because he’s the Knight #KKR deserves and the one they need right now” – Rinku Singh 😎#GTvKKR #TATAIPL #IPLonJioCinema | @KKRiders pic.twitter.com/b1QrN3fLjX
— JioCinema (@JioCinema) April 9, 2023