Helmet Man of India – देशभरातील अनेक शहरांमध्ये तुम्ही हेल्मेट घातलेल्या व्यक्तीला सोशल मीडियावर हेल्मेट वाटताना पाहिलं असेल. या व्यक्तीचे नाव राघवेंद्र कुमार असे आहे. ‘हेल्मेट मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ते चांगलेच प्रसिद्ध आहे. हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणाऱ्या लोकांना ते थांबवतात आणि त्यांना हेल्मेट घालायला लावतात.
View this post on Instagram
काही वर्षांपूर्वी राघवेंद्र कुमार यांचा खूप जवळचा मित्र कृष्ण कुमार यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. या घटनेने त्यांच्या हृदयावर आणि मनावर इतका खोल परिणाम केला की त्यांनी रस्ता सुरक्षा मोहीम राबवण्यासाठी आपले घरही विकले. गेल्या 10 वर्षांपासून देशातील 22 राज्यांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत लोकांना जागरुक करणारे राघवेंद्र कुमार आज आपल्या मिशनसाठी उत्तराखंडमध्ये पोहोचले आहे.
यावेळी वृत्तवाहिनीशी बोलतांना राघवेंद्र कुमार यांनी सांगितले की, 2014 मध्ये नोएडातील त्याचा जवळचा मित्र हेल्मेटशिवाय रस्त्यावर दुचाकी चालवत होता, तेव्हा त्याचा अपघात झाला. या अपघातात त्याच्या मित्राच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राघवेंद्र यांनी ठरवले की आता आपण रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती मोहीम राबवणार आहोत, जेणेकरुन अशा प्रकारे रस्ता अपघातात इतर कोणाचा मृत्यू होऊ नये. या मोहिमेला त्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय बनवले.
22 राज्यांमध्ये 60 हजार हेल्मेटचे वितरण
राघवेंद्र यांनी सांगितले की, गेल्या 10 वर्षांपासून त्यांनी देशभरातील 22 राज्यांमध्ये ही मोहीम चालवली आहे. आतापर्यंत त्यांनी 60 हजारांहून अधिक हेल्मेटचे वाटप केले असून 35 जणांचे प्राण वाचवण्यात त्यांना यश आले आहे. ते म्हणतात की, भारतातील रस्ते अपघातात दररोज शेकडो जीव गमावले जात आहे, त्यामुळे लोकांना वाहतूक नियमांबाबत जागरुक राहण्याची गरज आहे.
नोकरी सोडली आणि प्रचारासाठी वडिलोपार्जित जमीन विकली
हे काम करण्यासाठी राघवेंद्र यांनी आधी नोकरी सोडली, नंतर नोएडामधील घर विकले आणि देशभरात रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीम राबवायला सुरुवात केली. राघवेंद्रने या मोहिमेसाठी बिहारमधील आपली वडिलोपार्जित 7 बिघा जमीनही विकली आहे जेणेकरून रस्त्यावर हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणाऱ्या जास्तीत जास्त लोकांना मोफत हेल्मेट वाटप करता येईल. सोशल मीडियावर अनेक लोकांकडून त्यांच्या या मोहिमेचे कौतुक केले जात आहे.