नवी दिल्ली – हाथरस, भदोही येथे नुकत्याच घडलेल्या बलात्काराच्या घटनांनी उत्तर प्रदेश हादरले आहे हे खरे; किंबहुना पूर्ण देशच हादरला आहे. यातच माध्यमांना राजकीय नेत्यांना हाथरस घटनेतील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट न घेऊ दिल्यामुळे देशासह राज्यात तीव्र पडसाद उमटत होते.
Following the orders of Chief Minister Yogi Adityanath, the time given to the Special Investigation Team (SIT) to submit their report to the CM has been extended by 10 days: Awanish K Awasthi, State Additional Chief Secretary, Home Department. #HathrasCase
— ANI UP (@ANINewsUP) October 7, 2020
दरम्यान, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या ‘एसआयटी’ला बुधवारी आपला रिपोर्ट दाखल करायचा होता. मात्र, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आदेश देत एसआयटीला तपासासाठी दिलेला कालावधी दहा दिवसांनी वाढवला आहे. उत्तर प्रदेशच्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश अवस्थी यांनी याबाबत पत्रकरांना माहिती दिली.
तत्पूर्वी, उत्तर प्रदेशमधील सर्व स्त्रियांच्या सन्मान आणि स्वाभिमानाला छेडण्याचा प्रयत्न करण्याचा विचारही करणाऱ्याचा नाश निश्चित आहे. त्यांना अशी शिक्षा केली जाईल की, भविष्यात याकडे उदाहरण म्हणून पाहिले जाईल. तुमचे उत्तर प्रदेश सरकार प्रत्येक आई-बहिणीची सुरक्षा आणि विकास करण्यासाठी वचनबद्ध आहे. हा आमचा संकल्प आहे आणि वचनही आहे, असे ट्विट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले होते.