अहमदाबाद – उत्तरप्रदेशातील जनतेने विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला केवळ दोन जागा दिल्या. आता गुजरातमधील जनतेनेही त्यांचे राज्य उत्तरप्रदेशप्रमाणे कॉंग्रेसमुक्त बनवावे, असे आवाहन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी केले. भाजपच्या ( Gujarat Election ) प्रचारासाठी योगींची गुजरातमध्ये सभा झाली. त्या पक्षाचे स्टार प्रचारक असणाऱ्या योगींनी कॉंग्रेस आणि आपवर टीकेची झोड उठवली.
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यामुळे शिक्षकाला केले निलंबीत
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कॉंग्रेस पक्ष विसर्जित करण्याची भूमिका महात्मा गांधींनी मांडली होती. तसे करण्याची जबाबदारी आता गुजरातच्या जनतेची आहे. कॉंग्रेसमुक्त गुजरातमुळे राज्यातील जनतेच्या सर्वच समस्या संपतील. कॉंग्रेस आणि आप हे दोन्ही पक्ष सुरक्षेच्या दृष्टीने धोका आहेत. ते पक्ष विकासमार्गातील अडथळे आहेत, असे ते म्हणाले. आज गुजरात दंगलमुक्त आणि संचारबंदीमुक्त बनला आहे.
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यामुळे शिक्षकाला केले निलंबीत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने यशस्वीरित्या दहशतवाद, नक्षलवाद आणि फुटीरवादाचा बीमोड केला आहे, असा दावाही योगींनी केला. गुजरातमध्ये अनेक वर्षे सत्तेवर असणाऱ्या भाजपपुढे याआधीच्या निवडणुकांमध्ये केवळ कॉंग्रेस या पारंपरिक प्रतिस्पर्ध्याचेच आव्हान असायचे. मात्र, यावेळी आपनेही दखल घ्यायला लावली आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांकडून प्रचारात कॉंग्रेसबरोबरच आपलाही लक्ष्य करण्यात आले.