नवी दिल्ली – गुजरातच्या मोरबी येथील दुर्घटनेत 134 जणांचा मृत्यू झाला असून घड्याळ बनवण्याऱ्या कंपनीला या पुलाचे काम कसे काय देण्यात आले होते, असा सवाल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि राज्यात तातडीने निवडणुका घेतल्या जाव्यात अशी मागणीही केजरीवाल यांनी केली आहे.
पुलाच्या देखभालीच्या संदर्भात त्यांना कोणताही अनुभव नसताना त्यांना ठेका का देण्यात आला अशी विचारणा करताना त्यांचे पक्षाशी संबंध असल्याचे दिसून येते असा दावा केजरीवाल यांनी केला. ते पुढे म्हणाले की, पुलाच्या दुर्घटनेबाबत जी एफआयआर दाखल करण्यात आली आहे त्यात ना कंपनीचे ना तिच्या मालकाचे नाव आहे. त्यांनी पक्षाला भरपूर देणगी दिली असावी असे आरोप केले जात आहेत. त्याचा तपास करावा लागेल. मुख्यमंत्र्यांना या दुर्घटनेनंतर सत्तेवर राहण्याचा मुळीच अधिकार नाही. त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा.
परदेशातून गुजरातमध्ये येणाऱ्या हिंदूंना देणार भारताचे नागरिकत्व; केंद्र सरकारचा निर्णय https://t.co/QIMY20wlLa
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) November 1, 2022
मनिष सिसोदिया यांनी विचारले 5 प्रश्न
-घड्याळ बनवणाऱ्या कंपनीला पुलाचे काम का दिले?
-अनुभव नसलेल्या कंपनीला टेंडर न काढताच काम का दिले?
-8 महिन्यात पुलाचे काम पूर्ण होणार होते. एवढ्या गडबडीत 5 महिन्यांतच ते का पूर्ण करण्यात आले?
-घड्याळ बनवणाऱ्या कंपनीकडून किती देणगी घेतली?
-एफआयआरमध्ये कंपनीच्या मालकाचे नाव का नाही?